Monday, July 22, 2019

आता बाहेरुनही एअर बॅग

अपघातप्रसंगी येणार दोन गाड्यांच्या मध्ये 

अपघातप्रसंगी दोन वाहने एकमेकांवर आदळून प्रचंड हानी होते. वाहनांत बसलेल्यांच्या प्राणावर बेताने आणि अनेकदा प्राण जातातही. हे टाळण्यासाठी 'झेड एफ फ्राईडरिशचाफेन' या जर्मन कंपनीने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मोटारीच्या दोन्ही बाजूंना एअर बॅग बसवून गाडीवर बाजूने काही आदळताच त्या उघडतील असे तंत्र या कंपनीने विकसित केले आहे.

साधारणपणे १९९० पासून एअर बॅग या संरक्षक घटकाचा वापर वाहनांमध्ये वाढू लागला. भारतात हा प्रकार त्यामानाने उशिरा आला असला तरी आता युरो निकषांची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक गटातील गाडयांना चालकापुरती आणि वरच्या गटातील गाडयांना चालकाचा शेजारील आणि आतील प्रवासी या सर्वांसाठीच एअर बॅगची तरतूद करावी लागते. मोटारीच्या बाहेरच्या बाजूलाही एअर बॅग असली पाहिजे यासंबंधी अद्याप तरी कायद्याचे काही म्हणणे नाही, मात्र आतील एअर बॅगा वाहनात बसलेल्यांच्या सुरक्षेकरिता पुरेशा नाहीत असा विचार करून 'झेड एफ'ने बाहेरील एअर बॅगाही तयार केल्या आहेत.

या एअर बॅगा मोटारीच्या दोन्ही बाजूंना दरवाजांच्या तळाशी स्कर्टिंगवर बसविलेल्या असतात. एक तृतीयांशपेक्षा जास्त अपघात एका बाजूच्या धक्क्याचे असतात आणि त्यात प्राणहानीची शक्यताही असते. दुसरे वाहन बाजूने आदळले किंवा घासले अथवा त्याने वाहनाला एका बाजूने धडक दिली तर या बहिस्थ एअर बागेचे सेन्सर त्वरित कार्यान्वित होऊन आतील मध्यवर्ती संगणकाला सूचना देतात आणि एअर बॅग उघडते. ही सर्व प्रक्रिया धडक बसल्यापासून एका सेकंदाहूनही कमी वेळेत पार पडते. परिणामी आतल्या व्यक्तीला होणाऱ्या दुखापतीची तीव्रता अनेक पटींनी कमी होते.

साधारणपणे पुढच्या व मागच्या मडगार्डच्या मधली संपूर्ण जागा व्यापून या एअर बाग बसविलेल्या असतात आणि आतील सध्या उपलब्ध असणाऱ्या एअर बॅगांप्रमाणेच यांचेही कार्य चालते. मात्र या बॅगा विकसित करण्यासाठी 'झेड एफ'ला सहा सात वर्षे लागली. २०१२  मध्ये हे संशोधन कार्य सुरु झाले आणि नुकतेच ते यशाच्या पूर्णतेच्या टप्प्यात आले. मात्र रीतसर उत्पादन सुरु होण्यास २०२३ साल उजाडेल असे या कंपनीचे म्हणणे आहे. एअर बॅगचे  तंत्र प्रचारात असूनही इतका काळ लागण्याचे कारण असे की वाहन रस्त्याने चालताना विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक वस्तूंचा स्पर्श होतो, त्यामध्ये एखादा मनुष्य हलकासा आदळतोही, अशावेळी चटकन उघडण्याइतकी एअर बॅग अति संवेदनशीलही असता उपयोगी नाही, त्यामुळे संशोधन दीर्घ काळ चालले. मात्र भविष्यात स्वयंचलित वाहनांची वर्दळ वाढू लागली की या उपकरणाचा उपयोग फारच चांगला होईल असे कम्पनीतर्फे सांगण्यात आले.  

Sunday, July 14, 2019

'परिपूर्ण' सौर मोटारगाडी तयार होतेय!

सुरुवातीची सौर मोटारगाडी (सोलर कार)आपल्या नेहमीच्या मोटारीच्या टपावर एक आडवा लांब रुंद फळा ठेवल्यासारखी दिसे. अजूनही अशा प्रकारच्या मोटारी बनवून वापरात आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. अशी मोटार टपावरील सौर पॅनेलच्या साहाय्याने विजेची बॅटरी पुनर्भारित करते आणि तिच्या साहाय्याने चाकातील मोटार फिरून गाडीला गती मिळते.      आणखी वाचा 



Saturday, July 13, 2019

१२६२ सीसी क्षमतेची, अनेक प्रकारच्या तांत्रिक सुविधा पुरविलेली, चार चाकी एसयूव्हीप्रमाणे चढ रस्त्यावर मागे न येण्याची यंत्रणा बसविलेली हौशी मोटारसायकलस्वाराच्या कौशल्याला आव्हान देणारी 'दुकाटी मल्टिस्त्रादा DVT ट्विन नुकतीच भारतीय मोटरपेठेला खुली झाली. ३० लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेली आणि एकदा टाकी फुल्ल केली की तब्ब्ल ४५० किलोमीटर अंतर कापणारी ही मोटारसायकल रंगभेदानुसार  १९,९९००० आणि २०.२३,००० रुपये शोरूम किमतीला नवी दिल्लीत उपलब्ध आहे.                                                                             पुढे वाचा 

Wednesday, July 10, 2019

गरजेनुसार उघडणार इंजिनाचे व्हाल्व

CVVD तंत्रज्ञानावर चालणारी मोटार 
विजेवर चालणाऱ्या मोटारींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अनेक देश आखत असले तरी पारंपरिक पेट्रोलियम इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये नवीन सुधारणा करण्याचे संशोधन वाहन उत्पादकांनी थांबविले नाही. इंजिनाचे व्हाल्व गरजेनुसार कमीजास्त वेळ उघडे राहण्याची क्लुप्ती ह्युंदाई कंपनीने शोधून काढली असून या नव्या तंत्रामुळे इंधनाची बचत, इंजिनाच्या शक्तीची वाढ आणि धुराच्या प्रमाणात भरपूर घट साध्य होईल असा दावा त्यांनी केला आहे. या तंत्रज्ञानाला CVVD (कंटिन्युअसली  व्हेरिएबल व्हाल्व ड्युरेशन) असे नाव दिले आहे. यापूर्वीच अस्तित्त्वात आलेल्या या दोन्ही यंत्रणांपेक्षा हे निराळे आणि अधिक प्रगत तंत्रज्ञान असल्याचे 'ह्युंदाई'तर्फे सांगण्यात आले आहे. आणखी वाचा

Tuesday, July 9, 2019

भारतातील पहिलीवहिली विद्युत 'एसयूव्ही'

           संपूर्ण विजेच्या शक्तीवर चालणारी भारतातील पहिलीवहिली 'एसयूव्ही' ह्युंदाई कंपनीने भारतीय मोटरपेठेत ९ जुलै रोजी दाखल केली. सुमारे २५ लाख रुपये किमतीची ही मोटार एकदा चार्ज केलेल्या बॅटरीच्या शक्तीवर ४४९ किमी अंतर कापू शकेल.

आणखी वाचा

Sunday, July 7, 2019

काय म्हणतंय बजेट ?

         

अर्थसंकल्पापाठोपाठ पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याचा एक जमाना होता. मग ते वर्षातून केव्हाही वाढू लागले. गेली काही वर्षं पेट्रोलचे भाव अधूनमधून कमीही होत होते. भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाने भारतीयांना अनेक बाबतीत दिलासा दिला असला तरी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे ती जवळजवळ सगळ्याच वस्तूंच्या भाववाढीचं कारण ठरणार आहे. वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. त्याचवेळी विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या खरेदीवर मोठी सवलत शिवाय तिच्या खरेदीसाठी काढण्याच्या कर्जावरचं व्याज करमुक्त केल्यानं त्या मोटारी घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण अशा गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण सध्या तरी खूप कमी आहे. या विषयावर या सदरात यापूर्वी काही चर्चा झालीच आहे, आणखी काही करायची आहे ती नंतर करू.                              क्लिक - प्रकाशित लेख

               या वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार इंधनाबरोबरच रबराचे दर वाढतील. पुढे वाचा 

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...