कृत्रिम बुद्धिमत्ता करणार रहदारीचं नियंत्रण
वाहतुकीची कोंडी अर्थात ट्रॅफिक जॅम ही नित्याचीच बाब बनली
आहे. रस्त्यांचे रुंदीकरण,
एकेरी वाहतूक व्यवस्था, अवजड वाहनांना बंदी, पार्किंगला बंदी असे अनेक उपाय योजूनही रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा
आणि त्यातून कासवगतीपेक्षाही कमी वेगाने पुढे सरकणारी वाहने हे काही टळत नाही. ही
कोंडी कमी करून वाहने मार्गस्थ करताना पोलिसांची होणारी दमछाक ही या विषयाची दुसरी
महत्त्वाची बाजू आहे. वाहतूक कोंडीच्या व्याप्तीचा अंदाज घेऊन वाहने पुढे
काढण्याच्या कामाला पडणारी मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेता 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न जगात सुरू झाले आहेत.

ही नवी संकल्पना समजावून घेण्यापूर्वी वाहतुकीची कोंडी
होण्याची कारणे आणि कोंडी सोडविण्याचे पारंपरिक उपाय यांची अगदी थोडक्यात माहिती
घेऊया.
वाहतुकीची कोंडी का होते?
•
कोणत्याही एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने येणे
हे कोंडी होण्याचे पहिले कारण आहे. सकाळी कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी जाणारे
आणि सायंकाळी परतणारे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. अनेक शहरांत कार्यालये, बाजारपेठा विशिष्ट भागात केंद्रित झालेल्या असतात. त्यामुळे सकाळी आणि
संध्याकाळी रस्त्याच्या एकेका बाजूला वाहनांची गर्दी वाढते. ही कोंडी टाळण्यासाठी
वाहतूक पोलीस सकाळी आणि संध्याकाळी पार्किंग करण्याच्या जागा गर्दीच्या विरुद्ध
दिशेला आलटून पालटून ठेवतात. तात्पुरते रस्ता दुभाजक वापरून रस्त्याच्या मोकळ्या
बाजूला जादा मार्गिका निर्माण करतात.
•
सुटीच्या दिवसांत बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांच्या एकाच
दिशेने होणाऱ्या प्रवासामुळे रस्त्यांवर कोंडी होते.
•
शहरात काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी कर्मचारी भरती, पुढाऱ्यांच्या जंगी सभा, प्रसिद्ध महोत्सव हीदेखील
कोंडी होण्याची कारणे आहेत.
•
वाहन चालकांमधील शिस्तीचा अभाव, एखादे वाहन नादुरुस्त झाल्याने वाटेतच उभे राहणे, शहरात प्रवेश करतेवेळी दुतर्फा उभी असलेली वाहने, मर्यादेपेक्षा जास्त रुंदीचे सामान नेणाऱ्या वाहनांचा रस्त्यावर प्रवेश, या गोष्टी वाहतुकीच्या कोंडीची करणे ठरतात. रेल्वे फाटक बंद असताना दोन्हीकडे
उभी राहणारी वाहने आपापल्या बाजूंनी पुरेसा रस्ता मोकळा सोडत नाहीत. फाटक उघडताच
दोन्हीकडील वाहने चालू लागतात आणि अडकतात.
•
तीव्र चढणीच्या रस्त्यावर जास्त वाहने येणे, खराब रस्ते,
मोकाट गुरांचा रस्त्यांवर संचार ही करणेसुद्धा आहेत.
• पारंपरिक पद्धतीने
चालणाऱ्या सिग्नल यंत्रणेला वाहतुकीचे नियंत्रण करताना काही मर्यादा पडतात.
भारतातील सिग्नल यंत्रणेत रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या आणि हिरवा दिवा चालू
राहण्याचा काळ यांचा संबंध दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी हिरवा दिवा असणाऱ्या
रस्त्यांवरील वाहने संपल्यावरही दिवा पेटलेला राहतो. याउलट जास्त वाहने येणाऱ्या
रस्त्यांवर वाहनांना चौक ओलांडेपर्यंत पुनःपुन्हा थांबावे लागते.
कृत्रिम बुद्धिमत्ता काय करणार?
रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या आणि प्रत्येक वाहनाचा
वेग तसेच ते धावत असलेल्या मार्गिकेवरील त्याची हालचाल या गोष्टी अचूकपणे
ओळखण्याची क्षमता 'कृत्रिम बुद्धिमत्ते'मुळे वाहतूक नियंत्रक उपकरणांना प्राप्त झाली आहे. याबरोबरच वाहनांची
रस्त्यावरची हालचाल चालकानुसार भिन्न असते. ते बारकाईने टिपण्याची क्षमताही
कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त उपकरणांकडे असते. ही उपकरणे या गोष्टी केवळ ओळखून
थांबत नाहीत तर गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून ती वाहने संबंधित चौकात केव्हा
येतील आणि ती येतील तेव्हा चौकातील रहदारीची कोणती आणि कशी अवस्था असेल त्याचा वेध
घेऊन ताबडतोब त्यावर उपायही शोधतात. तो उपाय योग्य त्या वेळी आणि योग्य प्रकारे
योजण्यास तयार होऊन त्या त्या वाहनांचे पुढील चौकात स्वागत करण्यासाठी सज्ज
राहतात. हे सारे वाचण्यासाठी जितका वेळ लागला असेल त्यापेक्षा शंभरपट कमी वेळेत ही
कामगिरी उरकली जाते. अगदी निमिषार्धात (fractions of second) हे अगदी बिनचूकपणे पार पाडले जाऊ शकणार आहे.
आपल्या देशात सामान्यपणे विशिष्ट सेकंद चालू राहणाऱ्या
दिव्यांचे सिग्नल वापरले जातात. तथापि, रस्त्याच्या
पृष्ठभागाखाली बसवलेल्या सेन्सरद्वारे वाहनाचा वेध घेऊन आपोआप दिवे लागण्याची
यंत्रणा अमेरिकेसारख्या प्रगत देशांत चाळीस वर्षे तरी अस्तित्वात आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून उभारण्यात येणाऱ्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत
सेन्सरबरोबरच 'जीपीएस',
अतिसूक्ष्म चित्रण करणारे 'एचडी'
कॅमेरे, ड्रोन अशा उपकरणांचा वापर केला जातो.
' जीपीएस'
तंत्रज्ञान वापरून दुरून येणारे वाहन विशिष्ट ठिकाणी
पोहोचण्यास किती वेळ लागू शकतो त्याचा अंदाज घेता येईल. समजा, एक रुग्णवाहिका रस्त्यावरून शहराकडे जात आहे. तिची प्रतिमा सिग्नल यंत्रणेला
दिसताच वाट मोकळी होण्याच्या दृष्टीने सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
अत्यंत सूक्ष्म प्रतिमा घेणारे व्हिडिओ कॅमेरे (एचडी
कॅमेरे) रस्त्यावरील प्रत्येक वाहनाचे चित्रण करतील. स्वयंचलित उपकरणांद्वारे त्या
प्रतिमांचा अभ्यास करून वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. अशा प्रकारे वाहतूक
नियंत्रण करण्याचे दोन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात प्रतिमेचा अभ्यास होऊन
वाहनाचा वेग,
सिग्नलपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ आणि एकापाठोपाठ
येणाऱ्या वाहनांची संख्या या माहितीचे विश्लेषण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात
आवश्यकतेनुसार सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
या तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची उदाहरणे म्हणून चीनमधील
हाँगझो, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यातील पिट्सबर्ग या महानगरांची नांवे घेता
येतील.
'कृत्रिम बुद्धिमत्ते'च्या वापराचे फायदे:-
•
मनुष्यबळाची मोठी बचत हा या व्यवस्थेतून मिळणारा महत्त्वाचा
लाभ आहे. वाहतूक पोलिसांचे काम अत्यंत त्रासाचे, आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे आहे. त्यांना कामाचे तासही जास्त द्यावे
लागतात.
•
पोलिसांवरील ताण कमी होऊन तेच मनुष्यबळ अन्य संबंधित
कामासाठी वापरता येईल.
•
वाहनांच्या हालचालींचा आधीच अंदाज घेता आल्याने पर्यायी
मार्ग सुचविणे,
वाहने असतील त्यानुसार तांबडा अथवा हिरवा दिवा पेटविणे, वाहतूक सिग्नल आणि अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना यांत्रिक
व्यवस्थेद्वारे आपोआप दंड करणे तसेच नियंत्रक मनुष्यबळ आणि चालक यांच्यातील
वादविवाद टाळणे शक्य होईल.
टाटा सफारी परत आली !
भारतात तयार होणारी पहिली आधुनिकएसयूव्ही अशी नोंद झालेली ’टाटा सफारी’ पुन्हा भारतीय मोटारपेठेत दाखल झाली आहे. पूर्वीच्या ’सफारी’च्या बाह्यरूपात आणि अंतरंगात अनेक बदल केलेली आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत असलेली ही नवी गाडी सात आसनक्षमतेची असेल. चार सिलिंडरच्या २१७९ सीसी क्षमतेच्या डिझेल इंजिनाकडून तिला शक्तिपुरवठा करण्यात येईल. हे इंजिन दर ४००० फेऱ्यात १३८.१ बीएचपी शक्ती आणि १७०० ते २७०० फेऱ्यात ३२० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करील. ६५ लिटर क्षमतेची इंधन टाकी असणारी ही गाडी एक लिटर डिझेलमध्ये ११.५७ किमी अंतर कपू शकते अशी माहिती मिळाली आहे. नवी ‘सफारी’ चालक व प्रवाशांसाठी एअर बॅग, अँटिलॉक ब्रेक, इबीडी, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादी सुविधांसह मिळेल.

टाटा अलट्रोझ आय टर्बो
फक्त पेट्रोल इंजिन बसवलेली ‘टाटा अलट्रोझ आय टर्बो’ ही गाडी ‘टाटा मोटर्स’ने नुकतीच मोटारपेठेत उतरविली. तीन सिलिंडरच्या १.२ लिटर क्षमतेच्या पेट्रोल इंजिनाकडून तिला शक्तिपुरवठा होईल. १०८ बीएचपी शक्ती आणि १४० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे हे इंजिन ‘टाटा’च्याच ‘नेक्सन’ कडून घेतले आहे. यासोबत पांच गतींचा हाताने बदलण्याचा गिअर बॉक्स मिळेल. ही नवी शक्तिप्रणाली वापरलेली ही गाडी २८टक्के जास्त शक्ती आणि २४ टक्के जास्त टॉर्क निर्माण करील. शून्यावरून ताशी १०० किमी वेग गाठण्यास तिला अवघ्या ११.९ सेकंदांचा अवधी लागेल. एक लीटर पेट्रोलमध्ये ती १८.१३ किमी अंतर कापेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्या निवडीसाठी पर्याय उपलब्ध नसला तरी सुविधांनुसार ‘एक्सटी’, ‘एक्सझेड’ आणि ‘एक्सझेड प्लस’ अशा तीन प्रकारांत ती मिळेल. हार्बर ब्ल्यू, हाय स्ट्रीट गोल्ड, मिडटाउन ग्रे, डाउनटाउन रेड आणि अॅव्हेन्यू व्हाईट अशा रंगछटा आहेत. ही गाडी ह्युंदाय आय २०, फोक्सवागन पोलो यांची स्पर्धक मानली जात आहे.
ट्रायम्फ
स्ट्रीट ट्रिपल आरएस
युरोपीय देशांत २००७ साली आलेली 'स्ट्रीट ट्रिपल आरएस' ही 'ट्रायम्फ'ची
मोटारसायकल भारतीय मोटरपेठेत उपलब्ध झाली आहे. भारतीय ग्राहकांच्या हाती पडणाऱ्या
या मॉडेलची किंमत 11 लाख 13 हजार रुपये आहे आणि पूर्वीपेक्षा 9 टक्के
जास्त शक्ती आणि टॉर्कचा लाभ मिळणार आहे.
एका
ओळीत बसवलेले तीन सिलिंडर, प्रत्येकी चारप्रमाणे एकूण बारा व्हॉल्व असलेले
बीएस6 निकष
पूर्ण करणारे पेट्रोल इंजिन या गाडीवर बसवले आहे. अचाट शक्तिमान आणि अफाट वेगवान
असं त्याचे वर्णन केले पाहिजे. कारण प्रति मिनिट 11,750 फेऱ्यांमागे
ते 123 पीएस
एवढी प्रचंड ताकद निर्माण करते. त्याच वेळी 10,800 फेऱ्यांमागे
79 न्यूटन
मीटर टॉर्क निर्माण करते. यावरून या गाडीचा वेग आणि वेग घेण्याची क्षमता यांचा
अंदाज करता येईल.
मल्टि
पॉईंट सिक्वेन्शियल इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन या पद्धतीने या इंजिनला इंधन
पुरवठा होतो. 'एसएई
इलेक्ट्रॉनिक थ्रोटल कंट्रोल' पध्दतीने अक्सीलरेटर कमीजास्त करता
येतो. 'एसएई' म्हणजे
सडन अक्सीलरेशन इनसिडेन्स. वाहनांचा वेग झटकन कमीजास्त करताना झटका न बसता अलगद
गती कमीजास्त होते.
सहा
गतींचा गिअर बॉक्स असलेल्या या इंजिनला 'स्लिप असिस्ट' क्लच
आहे, आणि 'ओ
रिंग' पध्दतीचे
दुवे असलेल्या चेनमार्फत शक्ती व गती मागच्या चाकाला पुरवली जाते.
पुढील
सस्पेंशन अपसाईड डाउन पध्दतीचा फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक (मध्यभागी एकच)
सस्पेंशन वापरले आहे. पुढे 310 मिमी व्यासाची डिस्क आणि मागे 220 मिमी
व्यासाची डिस्क असलेले ब्रेक वापरले आहेत. स्विचच्या साहाय्याने चालूबंद करता
येणारी एबीएस सुविधा हे या गाडीच्या ब्रेक यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इंधन
न भरता 166 किलो
वजन आणि 17.4 लीटर
क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. या
गाडीची संपूर्ण भारतात सर्वत्र 11 लाख 13 हजार रुपये अशी समान किंमत आहे.
नवी 'महिंद्रा' 'KUV 100 NXT'
''बीएस
6' निकषांची पूर्तता करणारी 'महिंद्रा'ची नवी 'केयूव्ही 100
एनएक्सटी' मोटरपेठेत दाखल झाली आहे. 5 लाख 54 हजार ते 7 लाख 15
हजार रुपयांच्या दरम्यान विविध टप्प्यावर किंमत असणारी ही मोटार चार
प्रकारांत उपलब्ध होईल.
.1200 सीसी क्षमतेचे 'm FALCON G
80' नावाचे पेट्रोल इंजिन वापरलेल्या या
नव्या 'केयूव्ही'मध्ये स्वयंचलित गिअरबॉक्सचा पर्याय
नाही. तसेच ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनसह मिळते, डिझेल इंजिन नाही. 'मिड हायब्रीड' तंत्रज्ञान
वापरलेले हे पेट्रोल इंजिन 82 पीएस शक्ती आणि 115 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
'के 2+', 'के 4+', 'के 6+' आणि 'के 8+' अशा चार प्रकारांत ही गाडी मिळेल. सर्व प्रकारांत आसनक्षमता
सहा एवढीच आहे. मात्र 'के 2+' वगळता अन्य
तिन्ही प्रकारांत पुढे दोन आणि मागे तीन अशा बैठक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध आहे.
7 इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, ब्ल्यू टूथ, AUX संपर्कसुविधा, सेंट्रल लॉक, स्टेअरिंग व्हीलमध्ये बसविलेली ऑडिओ- टेलिफोन स्विच आणि
उंची जुळविता येणारी चालकाची बैठक ही वैशिष्ट्ये 'के 6+' आणि 'के 8+' यामध्ये उपलब्ध आहेत. 'के 2+'मध्ये सेंट्रल लॉक नाही, 'के 4+'मध्ये हाताने बंद करण्याचे सेंट्रल
लॉक आणि वरच्या दोन्ही गाड्यांना ते रिमोट कंट्रोलचे आहे.
इंजिन इम्मोबिलायझर, एसी व हीटर, इलेक्ट्रिक
पॉवर स्टेअरिंग, टिल्ट स्टेअरिंग या सुविधा सर्व मॉडेलमध्ये, तसेच चालक व
शेजारच्या व्यक्तीसाठी एअर बॅग, चाईल्ड सेफ्टी लॉक, सीट पट्ट्याची आठवण करून देणारा बझर या सुविधा चारही
प्रकारांत मिळतील.
चारही प्रकारांमध्ये एबीएस व ईबीडी
आहे, परंतु लहान
मुलांसाठी 'आयसोफिक्स' ही सुरक्षित
बैठक व्यवस्था फक्त 'के 8+' या सर्वात
वरच्या पातळीवरील मॉडेलमध्येच मिळेल.
'बीएस6' इंजिन ऑटोरिक्षाकरिता अनिवार्य
नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभासोबतच मोटार वाहनांना 'बीएस6' निकष लागू झाले
आहेत. याला कोणतेही वाहन अपवाद नाही. 'बीएस' निकष लागू करण्यास सुरुवात झाली तेव्हा भारतातील दोन चाकी वाहनांना फोर
स्ट्रोक इंजिने वापरणे अनिवार्य करण्यात आले. मात्र ऑटोरिक्षाचे इंजिन टू
स्ट्रोकचेच राहिले. परंतु या वेळी 'बीएस6' निकषांची पूर्तता करणारे इंजिन ऑटोरिक्षाकरिताही अनिवार्य झाले आहे.
महाराष्ट्रात 'बजाज', 'पिआगो' आणि 'टीव्हीएस' या
कंपन्यांच्या ऑटोरिक्षा वापरल्या जातात. या लेखात आपण 'बजाज
ऑटो'च्या रिक्षांचा विचार करू. बहुसंख्य रिक्षा कोणत्याही
शहरात अथवा गांवांत दिसतात. या कंपनीने 'बीएस6' निकष पूर्ण करणाऱ्या वेगवेगळ्या इंधनावर चालणाऱ्या रिक्षा विकसित केल्या
आहेत, आणि नवीन रिक्षा घेणाऱ्याला त्यातूनच निवड करावी लागेल.
'बजाज बीएस6' ऑटोरिक्षामध्ये पेट्रोल, सीएनजी, एलपीजी आणि डिझेल या इंधनांवर चालणारी गाडी निवडता येईल. पहिल्या तीन
इंधनासाठी एकच इंजिन आहे, आणि इंधनानुसार त्यांत किरकोळ फरक
आहेत. ही तिन्ही इंजिने प्रसंगी पेट्रोलवरही चालतात. नव्या निकषांच्या
शिफारशीप्रमाणे त्यांना अधिक कार्यक्षम कॅटालिटिक कन्व्हर्टर आणि रेडिएटर बसविले
आहेत. इंजिनाचे तापमान मोजून आवश्यक ती माहिती गाडीतील मध्यवर्ती संगणकीय नियंत्रक
उपकरणाला पुरविण्याचे काम करणारे सेन्सर्स बसविले आहेत. इंजिनमध्ये किंवा गाडीच्या
अन्य भागात काही बिघाड झाल्यास डॅशबोर्डावर सूचना देणारा दिवा पेटेल.
या तिन्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना 236
सीसी क्षमतेची फोर स्ट्रोक इंजिने वापरली आहेत. ती 9.8 बीएचपी एवढी शक्ती निर्माण
करतात. या इंजिनांना कारबुरेटर नाहीत, फ्युएल इंजेक्शन पद्धत
वापरली आहे. बाकी टायर साईझ, सस्पेंशन वगैरे पूर्वीप्रमाणेच
आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या गाडीची किंमत दहा ते पंधरा हजार
रुपयांनी वाढली आहे.
'बजाज' बनावटीच्या डिझेल ऑटोरिक्षाकरिता वापरलेले इंजिनही 'बीएस6'
या नव्या निकषांची पूर्तता करते. यालाही आवश्यक ते सेन्सर्स आहेत.
470 सीसी इंजिन आणि पाच पुढे जाण्याचे गिअर आणि रिव्हर्स आहे.
‘बीएस-6’ वाहनांची विक्री दहा लाखांच्या घरात
एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून 'बीएस6' निकष लागू
होण्याचा प्रारंभ झाला तेव्हा संपूर्ण देश 'कोरोना लॉकडाऊन'च्या खाईत लोटला गेला होता. इतर सर्व उद्योग धंद्यांसोबतच मोटरवाहनांच्या
एकजात सगळ्या शोरूम बंद झालेल्या होत्या. असे असले तरी मार्चअखेर देशभरात तब्बल दहा
लाख 'बीएस6' मोटारींची विक्री झाल्याचे
स्पष्ट झाले आहे. या विक्रीमध्ये एकट्या 'मारुती सुझुकी'चा तीन चतुर्थांश वाटा आहे, या कंपनीच्या साडेसात
लाख 'बीएस6' वाहनांची विक्री झाली आहे.
1 एप्रिल 2020 पासून भारतभर अमलात
यावयाच्या 'बीएस6' निकषांना सामोरे
जाण्याची देशातील सर्वच वाहन उत्पादकांनी तयारी केली होती. 31 मार्च रोजी
संपलेल्या 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या मध्यानंतर या दर्जाच्या गाड्या बहुतेक
कंपन्यांच्या शोरूममध्ये दाखल झाल्या होत्या. एका बाजूने 'बीएस4'
वाहने 31 मार्च 2020 पर्यंत खरेदी करण्याची मुभा असताना 'बीएस6' वाहनांच्या विक्रीला वाढता प्रतिसाद मिळत
होता. परिणामी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतर लॉकडाऊन होऊ लागेपर्यंत विक्रीचे
आंकडे दहा लाखापर्यंत सहज पोहोचले.
'ई टी ऑटो' या वाहनविषयक महत्त्वाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च
2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात साडेसात लाख वाहनांची विक्री करणाऱ्या 'मारुती सुझुकी'पाठोपाठ 'ह्युंडाई
मोटार'चा क्रमांक लागला आहे. 'ह्युंडाई'च्या 1,23,000 'बीएस6' गाड्या या काळात विकल्या गेल्या. त्यापाठोपाठ
'ह्युंडाई' गटातील 'किया मोटर्स', 'टोयोटा किर्लोस्कर' आणि 'एमजी मोटर्स' या तीन
कंपन्यांनी पहिल्या पांचांत स्थान मिळविले आहे. मात्र या तिन्ही कंपन्यांची 'बीएस6' विक्री एक लाखाच्या आत राहिली असून 'एमजी मोटर्स'ची 'बीएस6'
वाहनांची विक्री चारहजार एवढीच झाली आहे. 'टाटा
मोटर्स' आणि 'महिंद्रा' या दोन्ही स्वदेशी मोटार उत्पादकांच्या 'बीएस6'
मोटारींच्या विक्रीचा एकत्रित आकडा सातहजार एवढा आहे. विक्रीमध्ये
तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या 'किया' आणि 'एमजी' या भारतात अगदी नवीन कंपन्या असून 'किया'ची 'सेल्टोस' आणि 'एमजी मोटर्स'ची 'व्हेक्टर' या दोन्ही मोटारी गेल्या आर्थिक वर्षातच 'पहिली उत्पादने' म्हणून भारतीय मोटरपेठेत दाखल
झाल्या. मध्यम आणि उच्च गटातील या दोन्ही मोटारी अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या.
‘बीएस6' बोलेरो
'बीएस6' निकषांची पूर्तता
करणारी नवी महिंद्रा बोलेरो उपलब्ध झाली आहे. 'बी4',
'बी6' आणि 'ब6(0)'
अशा तीन पर्यायात ती मिळते. सध्या दिल्लीतील तिची शोरूम किंमत
मॉडेलनुसार 7 लाख 98 हजार, 8 लाख 64 हजार आणि 8 लाख 99 हजार
आहे.
महिंद्रा एम हॉक डी 75 हे
1.5 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन तिला शक्तीपुरवठा करते. 76 पीएस शक्ती आणि 210
न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे टर्बो इंजिन आणि पांच गतींचा हाताने गिअर
बदलण्याचा (मॅन्युअल) गिअरबॉक्स आहे.
ब्ल्यू टूथ, AUX आणि USB सुविधा, सर्व
मॉडेलमध्ये पुढे चालकासाठी एअर बॅग, चालक व शेजाऱ्याला सीट
बेल्ट लावण्याची सूचना देणारा बझर, स्पीड अलर्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि एबीएस तसेच वातानुकूलन व्यवस्था आहे. गाडीच्या
दुरुस्ती देखभालीची वेळ जवळ आल्याची आठवण करून देण्याची व्यवस्था डॅशबोर्डावरील
उपकरणात आहे.
'बीएस6'
मॉडेल विकसित करताना कंपनीने इंजिनवर जास्त भर दिलेला दिसतो.
बाह्यरूपात फार फरक नाही. पुढचा बंपर आकर्षक, त्यात फॉगलॅम्प,
नव्या डिझाईनचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प आणि नव्या डिझाईनचे पुढचे
रेडिएटर ग्रिल बसविलेली नवी बोलेरो सर्व पर्यायात सात आसनी मिळते. पुढे डिस्क आणि
मागे ड्रम ब्रेक आहेत.
'बीएस6'
निकषांची पूर्तता करण्यासाठी या गाडीच्या इंजिनबरोबर डिझेल एक्झॉस्ट
फ्ल्यूड (DEF) व्यवस्था आहे. यालाच काही कंपन्या add blue म्हणतात. इंजिनांतून बाहेर पडणाऱ्या धुरातील घातक
घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशिष्ट मायलेजनंतर हा द्रव पदार्थ भरावा लागतो.
गाडीच्या दोन्ही बाजूंच्या मागच्या चाकांच्या वर टाक्यांची झाकणे दिसतात. त्यातले
उजव्या बाजूचे डिझेल टाकीचे आहे, ते नेहमीप्रमाणे उघडते,
मात्र डाव्या बाजूला तसेच दिसणारे झाकण एकदम मागच्या (टेल गेट)
दरवाजाच्या आत दिलेली लीव्हर खेचून उघडावे लागते. ते DEF साठी आहे. हे काम अधिकृत अथवा प्रशिक्षित
मेकॅनिककडून करून घेणे उत्तम. डिझेलच्या टाकीत DEF आणि DEF च्या टाकीत डिझेल चुकूनही भरले जाणार नाही
याची काळजी वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे

रतीय मोटारवाहन उद्योगावरील मंदीची छाया, विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे भारत सरकारचे धोरण आणि पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या उत्पादनाबाबत भारतीय मोटार उत्पादक काहीसे संभ्रमात असण्याच्या संमिश्र पार्श्वभूमीवर 'किया' या कोरियन कंपनीची बहुप्रतीक्षित मोटार शनिवारी सरकत्या पट्ट्यावरून खाली उतरली. 'सेल्टोस' नावाची ही एसयूव्ही योगायोगाने नेमकी गोकुळाष्टमीच्याच मुहूर्तावर भारतीय मोटरपेठेत अवतरली.
नवी दिल्लीतील २०१८ सालच्या 'ऑटो एक्स्पो' प्रदर्शनात प्रथम सादर झालेली किया सेल्टोस १.४ लिटर आणि १.५ लिटर क्षमतेची दोन पेट्रोल इंजिने आणि १.५ लिटर डिझेल इंजिन असे तीन पर्याय आहे. सहा गतींचा साधा (हाताने बदलण्याचा) गिअरबॉक्स, सात गतींचा ड्युएल क्लच गिअरबॉक्स आणि सहा गतींचा स्वयंचलित गिअरबॉक्स हे पर्यायदेखील या गाडीसाठी दिले आहेत. गिअरबॉक्सच्या बाबतीत इतके आणि अशा प्रकारचे पर्याय देणारी 'किया सेल्टोस' ही भारतातील कारखान्यात तयार झालेली पहिलीच गाडी आहे. (ड्युएल क्लच गिअरबॉक्सच्या माहितीसाठी पहा : मोटार जगत जून २०१३ -येथे क्लिक करा )
सहा गतींचा साधा (हाताने बदलण्याचा) गिअरबॉक्स आणि सात गतींचा ड्युएल क्लच गिअरबॉक्स यांपैकी एक पर्याय निवडण्याची मोकळीक १.४ लिटर पेट्रोल इंजिन बसविलेल्या मॉडेलबाबत आहे. १.५ लिटर डिझेल इंजिनसोबत सहा गतींचा साधा (हाताने बदलण्याचा) किंवा सहा गतींचा स्वयंचलित गिअरबॉक्स मिळू शकतो.
ह्युंदाई या भारतात सुपरिचित असणाऱ्या ऑटोमोबाईल कंपनीचे भावंडं असणाऱ्या 'किया मोटर्स'ने भारतात सादर केलेली ही पहिलीवहिली मोटार सुरक्षा आणि सुविधांच्या अनेक बाबींनी युक्त आहे. या बाबी पुढीलप्रमाणे :
@ चोरीस गेलेली मोटार शोधण्यासाठी स्टोलन व्हेईकल ट्रॅकिंग (SVT)
@ कॅबिन मधील हवा शुद्ध करणारी यंत्रणा
@ चालकासह सहा एअर बॅग
@ मुलांच्या बैठकीसाठी आयसोफिक्स व्यवस्था
@ पुढे आणि मागे पार्किंग सेन्सर
@ ब्रेक फोर्स असिस्टसह अँटिलॉक ब्रेक सिस्टीम (ABS)
@ इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि चढ रस्त्यावर मागे येऊ नये म्हणून हिल असिस्ट

२०२१ मध्ये भारतात येणार 'नेक्सो' फ्युएल सेल कार
'नेक्सो' नावाची ही फ्युएल सेलवर चालणारी मोटार ह्युंदाईच्या क्रेटापेक्षाही आकाराने मोठी सलून कार आहे. १६३ पीएस शक्ती आणि ३९५ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे तिचे इंजिन पेट्रोलियम इंधन वापरत नसल्याने प्रदूषण करत नाही. किंबहुना ते नेहमीसारखे इंजिन नसून विद्युत मोटार आहे. अवघ्या ९.२ सेकंदांत ताशी १०० किमी एवढा वेग ती गाठू शकते. प्रत्येकी ५२.२ लिटरचा एक याप्रमाणे तीन टाक्यांमधून १५६.६ लिटर हायड्रोजन भरल्यावर 'नेक्सो' ६०० किमीचा पल्ला गाठू शकते. ही नोंद 'डब्ल्यूएलटीपी'च्या चाचणीवर आधारित असून कोरियन चाचणीनुसार ती ८०० किमी अंतर तोडते असा ह्युंदाईचा दावा आहे, तसेच टाकी फुल्ल केलेली 'नेक्सो' भारतात १००० किमी अंतरापर्यंत जाऊ शकेल असा विश्वास त्या कम्पनीने व्यक्त केला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या भारत कोरिया परिषदेच्या प्रसंगी ही मोटार सादर करण्यात आली होती. पुढच्या वर्षी तिची भारतीय रस्त्यांवर चाचणी घेण्यात येईल आणि २०२१ मध्ये ती भारतीय ग्राहकांसाठी शोरूममध्ये दाखल होईल. मात्र तिला इंधन पुरविण्याची सक्षम यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. सुरुवातीला नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आणि पाठोपाठ निवडक महानगरांमध्ये या गाडीसाठी हायड्रोजन फ्युएल स्टेशने स्थापन करण्यात येतील. हे काम खाजगी क्षेत्रातील उद्योगांबरोबर सहयोग करून होईल.
ही मोटार अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे. अडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) या तंत्रज्ञानामुळे सुरक्षेचे अनेक पैलू साध्य झाले आहेत. लेन फॉलोईंग असिस्ट (एलएफए) मुळे ताशी १४५ एवढ्या भरधांव वेगातही ती लेन सोडत नाही. मागच्या बम्परखालील वस्तू तसेच चालकाला सहज न दिसू शकणाऱ्या आड असलेल्या वस्तू (ब्लाइंड स्पॉट परिणाम) व्यवस्थित पाहता याव्या याकरिता विशेष ब्लाइंड स्पॉट कॉलिजन अव्हॉइडन्स असिस्ट (बीसीए) हे एक वैशिष्ट्य आहे. फॉरवर्ड कॉलिजन अव्हॉइडन्स असिस्ट (एफसीए) या यंत्रणेमुळे गाडी पळताना पुढे अचानक अडथळा आल्यास गाडी आपोआप उभी राहण्याची व्यवस्था होते.
खरे म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेल वापरलेली मोटार भारतात अद्याप आलीच नाही अशातला नाही, गेल्या वर्षी 'टाटा मोटर्स'ने अशा प्रकारची पहिली भारतीय बस तयार केली, ती सध्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत चालवली जात आहे. परंतु ह्युंदाई आणत असलेल्या फ्युएल सेल मोटारगाडीचे प्रयोग करण्याची आवश्यकता नाही, तिचे थेट उत्पादनच सुरु होईल. वर उल्लेख केल्याप्रमाणे तिला इंधनपुरवठा करण्यासाठी योग्य त्या संरचनेची उभारणी वेळेवर झाली पाहिजे. एकदोन प्रायोगिक मोटारींपेक्षा रीतसर उत्पादनातून बाजारपेठेत येणाऱ्या मोटारी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या जमान्याची पहाट लवकर घेऊन येतील.
पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा
पृथ्वीच्या पोटातील साठा आज ना उद्या संपणार या जाणिवेतून पर्यायी इंधनावर
मोटारवाहने चालविण्यासाठी
संशोधकांचे प्रयत्न नाही म्हटले तरी गेली पन्नास वर्षे तरी चालू असतील. त्यावेळी
पेट्रोलियम वाहनाद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार तेवढासा गंभीर झाला नव्हता.
पर्यायी इंधनापेक्षाही पर्यायी शक्तीवर चालणारी वाहने विकसित करण्यात वैज्ञानिक
गुंतले होते असे म्हणणे जास्त सयुक्तिक. या प्रयत्नांतून सौर उर्जेवर चालणारी
मोटारगाडी तयार करण्यात आली.
सुरुवातीची सौर मोटारगाडी (सोलर
कार)आपल्या नेहमीच्या मोटारीच्या टपावर एक आडवा लांब रुंद फळा ठेवल्यासारखी दिसे.
अजूनही अशा प्रकारच्या मोटारी बनवून वापरात आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरु
आहेत. अशी मोटार टपावरील सौर पॅनेलच्या साहाय्याने विजेची बॅटरी पुनर्भारित करते
आणि तिच्या साहाय्याने चाकातील मोटार फिरून गाडीला गती मिळते.
या प्रकारच्या सौर मोटारगाड्या
प्रदूषणकारी धूर हवेत सोडत नाहीत, घोंघावणारा
आवाज करत नाहीत, आणि
इंधनातील घटकद्रव्यांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषणही टाळतात. मात्र आतापर्यंत
त्यांच्या डोक्यावरचे मोठे थोरले पॅनल हा वाहतुकीतील एक अडथळा ठरत होता. आता मात्र
यावरही उपाय शोधणारे संशोधन झाले आहे. 'लायटीयर' नावाची 'परिपूर्ण' म्हणता येईल अशी एक सौर मोटारगाडी एका
अप्रसिद्ध डच कंपनीनेतयार केली आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यावर असा
अवाढव्य फळा नाही. तिच्या बॉनेटमध्ये आणि टपामध्ये सौर पॅनल बसविले आहेत. ती नेहमीच्या मोटारगाडीसारखी दिसते.
तिच्या मोठ्या आकारामुळे ती बाहेरून
आलिशान दिसतेय आणि आतील विद्युत उपकरणांद्वारे मिळणाऱ्या सुविधांमुळे ती ऐषारामी
वाटते.

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी सज्ज लायटीयरचा अंतर्भाग
अवघ्या दहा सेकंदांत ताशी १०० किलोमीटर
वेग गाठणारी ही मोटार एकदा भारित झालेल्या बॅटरीच्या शक्तीवर थोडीथोडकी नव्हे तर
७२५ किलोमीटर
अंतर कापते. याचा अर्थ सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक विद्युत मोटारीपेक्षा
बरेच जास्त अंतर ती तोडू शकते. अशा प्रकारची आणखी एक मोटारगाडी 'टोयोटा'देखील तयार करत आहे. 'प्रायस' तिचे नाव. वीस वर्षांपूर्वी प्रायस ही
पहिली हायब्रीड मोटार म्हणून जगापुढे आली. परंतु अजूनही तिचे सौर रूप बाजारात
येण्यास सिद्ध झाले नाही. ते जरी प्रायोगिक अवस्थेत असले तरी ते 'परिपूर्ण सौर मोटारगाडी' आहे असे म्हणता येईल अशा टप्प्यावर आले
आहे.
दुकाटी मल्टिस्त्रादा
१२६२ सीसी क्षमतेची, अनेक प्रकारच्या तांत्रिक सुविधा पुरविलेली, चार चाकी एसयूव्हीप्रमाणे चढ रस्त्यावर मागे न येण्याची यंत्रणा बसविलेली हौशी मोटारसायकलस्वाराच्या कौशल्याला आव्हान देणारी 'दुकाटी मल्टिस्त्रादा DVT ट्विन नुकतीच भारतीय मोटरपेठेला खुली झाली. ३० लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेली आणि एकदा टाकी फुल्ल केली की तब्ब्ल ४५० किलोमीटर अंतर कापणारी ही मोटारसायकल रंगभेदानुसार १९,९९००० (लाल) आणि २०.२३,००० (सॅण्ड -राखी) रुपये शोरूम किमतीला नवी दिल्लीत उपलब्ध आहे.
ट्विन सिलिंडर इंजिनची ही मोटारसायकल म्हणजे स्वयंचलित दुचाकीच्या विश्वातील 'लक्झरी' मानली जाते. दर मिनिटाला ९५०० फेऱ्यांत १५८ पीएस एवढी जबरदस्त निर्माण करणाऱ्या या मोटारसायकलची वेग घेण्याची क्षमता कल्पनातीत आहे. तिच्या प्रगत इंजिनाखेरीज वेधून घेणाऱ्या अन्य बाबी पुष्कळ आहेत. मोटारसायकलस्वाराच्या साहसाला सर्व प्रकारे वाव देणारे डिझाईन म्हणून या गाडीकडे पाहता येईल.
दुकाटी सेफ्टी पॅक - यामध्ये बॉश कॉर्नरिंग एबीएस आणि दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश होतो. अतिवेगवान मोटारसायकलींची रस्त्यावरची पकड विशेषतः: वळणावर सैल होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी कॉर्नरिंग एबीएस उपयोगी पडते. गाडीचा वेग आणि रस्त्यावरची पकड यांचे सांगड दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल घालते. याबरोबरच एकाएकी ब्रेक लावतं गाडी मागून उचलली जाऊ नये यासाठी दुकाटी व्हीली कंट्रोल ही यंत्रणा काम करते. या सर्व व्यवस्थांमुळे भरवेगात वळणे घेत जातानाही गाडी रस्ता न सोडता पळू शकते.
अर्थात सुपरबाइक चालविण्याचा भरपूर सर्व आणि अत्यंत सुस्थितीतील रस्ते या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याबरोबरच सार्वजनिक रस्त्यावरून अशी मोटारसायकल चालविताना वाहतुकीचे नियम, वेगमर्यादा आणि रस्ता वापरणारे इतर घटक यांचे भान राखले पाहिजे.
'मल्टिस्त्रादा'च्या काऊलचे डिझाईन अशा पद्धतीने केले आहे की समोरून पाहताच मानवी चेहऱ्याचा भास
होतो. तिच्या हेडलाईटची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाडी वळू लागताच तिचे दिवे रस्त्याचा कडेच्या भागावर प्रकाशझोत टाकतात. त्यांना 'कॉर्नरिंग लाईट' म्हटले ते बरोबरच आहे. एखाद्या कारच्या डॅशबोर्डसारखा हिचा डॅशबोर्ड ५ इंची रंगीत डिस्प्ले स्क्रीन आणि अनेक प्रकारच्या सूचना आणि माहिती देणाऱ्या दिव्यांनी आणि प्रमापीनी (गेजेस) भरलेला आहे. अशी गाडी चालविण्याचा आनंद अवर्णनीयच !
'मल्टिस्त्रादा'च्या आणखी एका वैशिष्ट्याचा उल्लेख केलाच पाहिजे. चढ रस्त्यावर टी उभी करावी लागली तर पुढचा ब्रेक लावून धरता येईल, पण गिअर टाकणं पुढे नेण्यासाठी ब्रेक सोडताच ती मागे सरकू लागेल. २२५ किलो वजनाची बाईक तीव्र चढावर केवळ ब्रेक आणि पायाच्या जोरावर रोखून धरणे तसे जोखमीचेच, पण उत्पादकांनी चार चाकी एसयूव्हीमध्ये असतात तशा प्रकारचे हिल असिस्ट हिला बसविले आहे. 'व्हेईकल होल्ड कंट्रोल (VHC)' या नावाने ते ओळखले जाते.
'मल्टिस्त्रादा टेस्टास्ट्रेटा' नावाची कमीजास्त क्षमतेच्या इंजिनांच्या मोटारसायकलींची मालिकाच 'दुकाटी'ने सादर केली असून 'मल्टिस्त्रादा १२६० एन्ड्युरा' हे त्यातील अगदी नवे उत्पादन आहे. अनेक प्रकारच्या सुरक्षाविषयक उपकरणांचे कवच पुरविलेली ही मोटारसायकल साहसी स्वाराला चालविण्याचा आनंदी देईल आणि धोक्याच्या भीतीपासून मुक्तही ठेवील असे समजायला हरकत नसावी.
'कोना इलेक्ट्रिक' - ह्युंदाईने आणली पहिली विद्युत एसयूव्ही
'कोना इलेक्ट्रिक' नावाची ही मोटार पूर्णपणे विजेच्या शक्तीवर काम
करील. नेहमीच्या
गाडीप्रमाणे पेट्रोल किंवा डिझेल इंजिन तिच्यासाठी वापरले नसून तिच्या चासीस
प्लॅटफॉर्मची रचनाही वेगळी आहे. मात्र
बॉनेट उघडल्यावर प्रथमदर्शनी नेहमीच्या कारप्रमाणेच इंजिन दिसते. विद्युत मोटार, गिअर बॉक्स आणि त्यांच्या
पूरक यंत्रणा एकत्रित बसविलेला हा शक्तिसंच तशी २८ किलोवॅट शक्तीच्या बॅटरीकडून
वीज घेऊन चाकांना८८ वॅट शक्तीच्या मोटरद्वारे गती पुरवितो.
या गाडीची बॅटरी संपूर्ण
पुनर्भारित करण्यासाठी
९ तास ३५ मिनिटे लागतात,
हे काम चार्जिंग स्टेशनवर होते त्याप्रमाणेच घरच्या घरीही करता
येते. प्रवासात असताना ५४ मिनिटांत बॅटरी ८०% पुनर्भारित करता येते. याबरोबरच गाडी
चालताना जेव्हा तिचा वेग कमी होईल तेव्हा वीजनिर्मिती होऊन बॅटरीच्या शक्तीची बचत
करता येते.
या
गाडीची पाच वर्षांची अमर्याद अंतर हमी (अनलिमिटेड मायलेज वॉरंटी) उत्पादकांनी दिली
आहे. यासोबतच आठ वर्षे किंवा दोन लाख किलोमीटर अंतराची हमी (वॉरंटी) उत्पादकांनी
या गाडीच्या बॅटरीकरिता दिली आहे.
काय म्हणतंय बजेट ?
या वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार इंधनाबरोबरच रबराचे दर वाढतील.
परिणामी टायर,
ट्यूब, रबर बिडिंग, वायपरची पाती,
मोटारीत
ठिकठिकाणी बसणारी रबर बुशिंग्ज, ऑइल सील,
ओ रिंग यांच्या
किमती वाढतील. याचा परिणाम नव्या गाड्यांच्या आणि सुट्या भागांच्या किमतीवर होईल.
अत्यंत आरामदायक आणि महागड्या मोटारींना लागणाऱ्या आयात करावयाच्या काही घटकांच्या
आयात शुल्कांत वाढ केल्याने त्याच अंतिम परिणाम गाडीच्या किमतीवर होणारच.
मर्सिडीज,
व्होल्वो, मेबॅक अशा लाखो रुपये किमतीच्या मोटारी
घेणारा वर्ग भारतात आता वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी औरंगाबादेत एका महिन्यात
दोनशे मर्सिडीज मोटारी खरेदी करून भारतीयांनी आपली वाढती क्रयशक्ती सिद्ध केली
आहे. परंतु सध्या ऑटोमोबाईल उद्योग मंदीतून जात असल्याने ही करवाढ अपेक्षित नव्हती
अशी प्रतिक्रिया त्यातून उमटली आहे.
विजेवर चालणाऱ्या मोटारींच्या बॅटऱ्या
करसवलतीमुळे स्वस्त होतील,त्यामुळे अशा बॅटऱ्या बनविणाऱ्या
कारखान्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं, परंतु तरीही पेट्रोल डिझेल गाडीइतकं काम करणारी आणि त्याच आकारमानाची विद्युत
मोटार सामान्यांना परवडेल इतक्या किमतीत मिळत नाही. भरपूर कर सवलत मिळूनही विद्युत
'वॅगन आर' साध्या 'वॅगन आर'पेक्षा जवळजवळ दीडपट किमतीला बसते. शिवाय ती एक चार्जमध्ये पेट्रोल टाकी 'फुल्ल' केलेल्या गाडीइतकं अंतरतोडू शकत नाही. तेवढ्या क्षमतेची मोटार घ्यायची तर आणखी
पाचसात लाख रुपये घालावे लागतील. उद्याच्या मंगळवारी भारतीय मोटरपेठेत अवतरत
असलेली ह्युंदाई 'कोना ' ही विजेवरची पहिली भारतीय एसयूव्ही असेल. पण तिच्याएवढ्या क्षमतेची
पेट्रोल/डिझेलवरची एसयूव्ही बारा ते पंधरा लाखापर्यंत उपलब्ध होते आणि ही मोटार पंचवीस लाखाला मिळणार आहे, हे उदाहरण पुरेसं बोलकं ठरावं.
पेट्रोल आणि डिझेलवर कर लादून त्यांच्या किमती वाढविल्यावर त्या इंधनांवर चालणाऱ्या मोटारी मोडीत काढून लोक लगेच विजेवरच्या गाड्या खरेदी करतील असे कोणालाही वाटत असेल तर ते हास्यास्पद ठरेल. केवळ बॅटरी चार्जिंगचा खर्च नगण्य येणे पुरेसे नाही. त्या बचतीकडे बघून एखाद्याला विद्युत वाहन घ्यावेसे वाटले तर त्यासाठी जी किंमत मोजावी लागेल तिचा मासिक हप्ता त्याला परवडेल का? नवी एसयूव्ही घेण्यासाठी पंधरा लाख उभे करू शकणाऱ्याला केवळ धावत खर्च कमी म्हणून सहज पंचवीस लाख उभे करता येतील? नव्या गाडीसाठी वित्तसहाय्य देणाऱ्या कंपन्या त्या कर्जदाराच्या हप्ते फेडण्याच्या क्षमतेचा विचार करून कर्ज मंजूर करतील की कोणत्या प्रकारच्या गाडीला विशेष करसवलत आहे ते पाहतील? याचा विचार केला की कर वाढविण्यामागे सामान्य माणसाला त्रास देण्याचा विचार नव्हता तर पर्यावरणस्नेही वाहनांना प्रोत्साहन देण्याचा हेतू होता असे वित्तमंत्रीमहोदया त्यातून विनोद निर्मितीपलिकडे काही साधणार नाही हे उमगेल.
विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविण्यापूर्वी इतर अनेक बाजू विचारात घेतल्या पाहिजेत. प्रत्यक्ष वाहन उत्पादकांची तयारी ही त्यापैकी एक. एक तर भारतीय मोटरपेठेत सध्या मंदी आहे, वाहन उत्पादक 'युरो ६'ला सामोरे जाण्यासाठी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटारी अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी संशोधन करीत आहेत. मोटार कारच्या उत्पादनाकडून ते एसयूव्हीच्या उत्पादनाकडे वळताहेत. विद्युत वाहने तयार करायची तर पेट्रोलिअम वाहनांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी थाटलेल्या प्रयोगशाळांच्या उभारणीवर केलेल्या गुंतवणुकीचे काय करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.
मोटार वाहन उद्योग हे भारतातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. सध्याच्या मोटार वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय खूप व्यापक आहे. विद्युत मोटारगाड्यांमध्ये इंजिन दुरुस्तीला वाव नाही. शिवाय 'वापरा आणि टाका' या प्रकारात ती मोडत असल्याने इतर कामे करणाऱ्यांना ती कितपत वाव देईल ते आत्ताच सांगता येणार नाही. सध्या उपलब्ध असणाऱ्या काही विद्युत मोटारी सात आठ वर्षांच्या वॉरन्टीसह मिळतात. त्यांच्या बॅटऱ्यांचे आयुष्य संपले की नवी बॅटरी घालण्यापेक्षा संपूर्ण गाडीच बदलणे परवडेल अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे दुरुस्तीचा प्रश्नच येत नाही. या मोटारींच्या उत्पादनावर भर द्यायचा तर हा रोजगार निर्मितीचा मुद्दा कळीचा ठरेल. या गाड्यांच्या निर्मितीआणि विक्री प्रक्रियेत काम गमावलेल्या मेकॅनिक आणि अन्य कारागिरांना कुठे आणि कसे सामावून घेणार हा प्रश्न सोडविणे सोपे नाही.
विद्युत वाहनांच्या बॅटऱ्या पुनर्भारित करण्याच्या यंत्रणेचे सक्षम जाळे विणणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एसटीसारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेने लांब पल्ल्याच्या मार्गांवर विद्युत बसगाड्या आणण्याचे ठरविले आहे खरे, पण त्याकरिता स्वतःची सक्षम आणि जलद बॅटरी चार्जिंग व्यवस्था आधी उभारली पाहिजे, नाहीतर विद्युत बससेवेचा बोऱ्या वाजणार; आणि आपल्याकडे असेच नेहमी होते.
विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यावर या सरकारचा भर असला तरी त्यासाठी आवश्यक
ती
संरचना उभी
राहिल्याशिवाय ही वाहनं
वापरणं
व्यवहार्य ठरणार नाही. विद्युत वाहनांच्या वापरानं प्रदूषणाला आला बसेल, अब्जावधी रुपयांची इंधन बचत होईल, हे खरं असलं तरी रस्ते सध्यातरी रस्ते वाहतुकीच्या विद्युतीकरणाची
घाई न करता सबुरी असावी हे बरे .
एसटी, बेस्ट बसेस धावणार विजेच्या शक्तीवर
कृत्रिम बुद्धिमत्ता करणार रहदारीचं नियंत्रण
वाहतुकीची कोंडी अर्थात ट्रॅफिक जॅम ही नित्याचीच बाब बनली
आहे. रस्त्यांचे रुंदीकरण,
एकेरी वाहतूक व्यवस्था, अवजड वाहनांना बंदी, पार्किंगला बंदी असे अनेक उपाय योजूनही रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा
आणि त्यातून कासवगतीपेक्षाही कमी वेगाने पुढे सरकणारी वाहने हे काही टळत नाही. ही
कोंडी कमी करून वाहने मार्गस्थ करताना पोलिसांची होणारी दमछाक ही या विषयाची दुसरी
महत्त्वाची बाजू आहे. वाहतूक कोंडीच्या व्याप्तीचा अंदाज घेऊन वाहने पुढे
काढण्याच्या कामाला पडणारी मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेता 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न जगात सुरू झाले आहेत.

ही नवी संकल्पना समजावून घेण्यापूर्वी वाहतुकीची कोंडी
होण्याची कारणे आणि कोंडी सोडविण्याचे पारंपरिक उपाय यांची अगदी थोडक्यात माहिती
घेऊया.
वाहतुकीची कोंडी का होते?
•
कोणत्याही एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने येणे
हे कोंडी होण्याचे पहिले कारण आहे. सकाळी कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी जाणारे
आणि सायंकाळी परतणारे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. अनेक शहरांत कार्यालये, बाजारपेठा विशिष्ट भागात केंद्रित झालेल्या असतात. त्यामुळे सकाळी आणि
संध्याकाळी रस्त्याच्या एकेका बाजूला वाहनांची गर्दी वाढते. ही कोंडी टाळण्यासाठी
वाहतूक पोलीस सकाळी आणि संध्याकाळी पार्किंग करण्याच्या जागा गर्दीच्या विरुद्ध
दिशेला आलटून पालटून ठेवतात. तात्पुरते रस्ता दुभाजक वापरून रस्त्याच्या मोकळ्या
बाजूला जादा मार्गिका निर्माण करतात.
•
सुटीच्या दिवसांत बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांच्या एकाच
दिशेने होणाऱ्या प्रवासामुळे रस्त्यांवर कोंडी होते.
•
शहरात काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी कर्मचारी भरती, पुढाऱ्यांच्या जंगी सभा, प्रसिद्ध महोत्सव हीदेखील
कोंडी होण्याची कारणे आहेत.
•
वाहन चालकांमधील शिस्तीचा अभाव, एखादे वाहन नादुरुस्त झाल्याने वाटेतच उभे राहणे, शहरात प्रवेश करतेवेळी दुतर्फा उभी असलेली वाहने, मर्यादेपेक्षा जास्त रुंदीचे सामान नेणाऱ्या वाहनांचा रस्त्यावर प्रवेश, या गोष्टी वाहतुकीच्या कोंडीची करणे ठरतात. रेल्वे फाटक बंद असताना दोन्हीकडे
उभी राहणारी वाहने आपापल्या बाजूंनी पुरेसा रस्ता मोकळा सोडत नाहीत. फाटक उघडताच
दोन्हीकडील वाहने चालू लागतात आणि अडकतात.
•
तीव्र चढणीच्या रस्त्यावर जास्त वाहने येणे, खराब रस्ते,
मोकाट गुरांचा रस्त्यांवर संचार ही करणेसुद्धा आहेत.
• पारंपरिक पद्धतीने
चालणाऱ्या सिग्नल यंत्रणेला वाहतुकीचे नियंत्रण करताना काही मर्यादा पडतात.
भारतातील सिग्नल यंत्रणेत रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या आणि हिरवा दिवा चालू
राहण्याचा काळ यांचा संबंध दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी हिरवा दिवा असणाऱ्या
रस्त्यांवरील वाहने संपल्यावरही दिवा पेटलेला राहतो. याउलट जास्त वाहने येणाऱ्या
रस्त्यांवर वाहनांना चौक ओलांडेपर्यंत पुनःपुन्हा थांबावे लागते.
कृत्रिम बुद्धिमत्ता काय करणार?
रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या आणि प्रत्येक वाहनाचा
वेग तसेच ते धावत असलेल्या मार्गिकेवरील त्याची हालचाल या गोष्टी अचूकपणे
ओळखण्याची क्षमता 'कृत्रिम बुद्धिमत्ते'मुळे वाहतूक नियंत्रक उपकरणांना प्राप्त झाली आहे. याबरोबरच वाहनांची
रस्त्यावरची हालचाल चालकानुसार भिन्न असते. ते बारकाईने टिपण्याची क्षमताही
कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त उपकरणांकडे असते. ही उपकरणे या गोष्टी केवळ ओळखून
थांबत नाहीत तर गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून ती वाहने संबंधित चौकात केव्हा
येतील आणि ती येतील तेव्हा चौकातील रहदारीची कोणती आणि कशी अवस्था असेल त्याचा वेध
घेऊन ताबडतोब त्यावर उपायही शोधतात. तो उपाय योग्य त्या वेळी आणि योग्य प्रकारे
योजण्यास तयार होऊन त्या त्या वाहनांचे पुढील चौकात स्वागत करण्यासाठी सज्ज
राहतात. हे सारे वाचण्यासाठी जितका वेळ लागला असेल त्यापेक्षा शंभरपट कमी वेळेत ही
कामगिरी उरकली जाते. अगदी निमिषार्धात (fractions of second) हे अगदी बिनचूकपणे पार पाडले जाऊ शकणार आहे.
आपल्या देशात सामान्यपणे विशिष्ट सेकंद चालू राहणाऱ्या
दिव्यांचे सिग्नल वापरले जातात. तथापि, रस्त्याच्या
पृष्ठभागाखाली बसवलेल्या सेन्सरद्वारे वाहनाचा वेध घेऊन आपोआप दिवे लागण्याची
यंत्रणा अमेरिकेसारख्या प्रगत देशांत चाळीस वर्षे तरी अस्तित्वात आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून उभारण्यात येणाऱ्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत
सेन्सरबरोबरच 'जीपीएस',
अतिसूक्ष्म चित्रण करणारे 'एचडी'
कॅमेरे, ड्रोन अशा उपकरणांचा वापर केला जातो.
' जीपीएस'
तंत्रज्ञान वापरून दुरून येणारे वाहन विशिष्ट ठिकाणी
पोहोचण्यास किती वेळ लागू शकतो त्याचा अंदाज घेता येईल. समजा, एक रुग्णवाहिका रस्त्यावरून शहराकडे जात आहे. तिची प्रतिमा सिग्नल यंत्रणेला
दिसताच वाट मोकळी होण्याच्या दृष्टीने सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
अत्यंत सूक्ष्म प्रतिमा घेणारे व्हिडिओ कॅमेरे (एचडी
कॅमेरे) रस्त्यावरील प्रत्येक वाहनाचे चित्रण करतील. स्वयंचलित उपकरणांद्वारे त्या
प्रतिमांचा अभ्यास करून वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. अशा प्रकारे वाहतूक
नियंत्रण करण्याचे दोन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात प्रतिमेचा अभ्यास होऊन
वाहनाचा वेग,
सिग्नलपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ आणि एकापाठोपाठ
येणाऱ्या वाहनांची संख्या या माहितीचे विश्लेषण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात
आवश्यकतेनुसार सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
या तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची उदाहरणे म्हणून चीनमधील
हाँगझो, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यातील पिट्सबर्ग या महानगरांची नांवे घेता
येतील.
'कृत्रिम बुद्धिमत्ते'च्या वापराचे फायदे:-
•
मनुष्यबळाची मोठी बचत हा या व्यवस्थेतून मिळणारा महत्त्वाचा
लाभ आहे. वाहतूक पोलिसांचे काम अत्यंत त्रासाचे, आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे आहे. त्यांना कामाचे तासही जास्त द्यावे
लागतात.
•
पोलिसांवरील ताण कमी होऊन तेच मनुष्यबळ अन्य संबंधित
कामासाठी वापरता येईल.
•
वाहनांच्या हालचालींचा आधीच अंदाज घेता आल्याने पर्यायी
मार्ग सुचविणे,
वाहने असतील त्यानुसार तांबडा अथवा हिरवा दिवा पेटविणे, वाहतूक सिग्नल आणि अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना यांत्रिक
व्यवस्थेद्वारे आपोआप दंड करणे तसेच नियंत्रक मनुष्यबळ आणि चालक यांच्यातील
वादविवाद टाळणे शक्य होईल.
टाटा सफारी परत आली !
भारतात तयार होणारी पहिली आधुनिकएसयूव्ही अशी नोंद झालेली ’टाटा सफारी’ पुन्हा भारतीय मोटारपेठेत दाखल झाली आहे. पूर्वीच्या ’सफारी’च्या बाह्यरूपात आणि अंतरंगात अनेक बदल केलेली आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत असलेली ही नवी गाडी सात आसनक्षमतेची असेल. चार सिलिंडरच्या २१७९ सीसी क्षमतेच्या डिझेल इंजिनाकडून तिला शक्तिपुरवठा करण्यात येईल. हे इंजिन दर ४००० फेऱ्यात १३८.१ बीएचपी शक्ती आणि १७०० ते २७०० फेऱ्यात ३२० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करील. ६५ लिटर क्षमतेची इंधन टाकी असणारी ही गाडी एक लिटर डिझेलमध्ये ११.५७ किमी अंतर कपू शकते अशी माहिती मिळाली आहे. नवी ‘सफारी’ चालक व प्रवाशांसाठी एअर बॅग, अँटिलॉक ब्रेक, इबीडी, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादी सुविधांसह मिळेल.

टाटा अलट्रोझ आय टर्बो
फक्त पेट्रोल इंजिन बसवलेली ‘टाटा अलट्रोझ आय टर्बो’ ही गाडी ‘टाटा मोटर्स’ने नुकतीच मोटारपेठेत उतरविली. तीन सिलिंडरच्या १.२ लिटर क्षमतेच्या पेट्रोल इंजिनाकडून तिला शक्तिपुरवठा होईल. १०८ बीएचपी शक्ती आणि १४० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे हे इंजिन ‘टाटा’च्याच ‘नेक्सन’ कडून घेतले आहे. यासोबत पांच गतींचा हाताने बदलण्याचा गिअर बॉक्स मिळेल. ही नवी शक्तिप्रणाली वापरलेली ही गाडी २८टक्के जास्त शक्ती आणि २४ टक्के जास्त टॉर्क निर्माण करील. शून्यावरून ताशी १०० किमी वेग गाठण्यास तिला अवघ्या ११.९ सेकंदांचा अवधी लागेल. एक लीटर पेट्रोलमध्ये ती १८.१३ किमी अंतर कापेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्या निवडीसाठी पर्याय उपलब्ध नसला तरी सुविधांनुसार ‘एक्सटी’, ‘एक्सझेड’ आणि ‘एक्सझेड प्लस’ अशा तीन प्रकारांत ती मिळेल. हार्बर ब्ल्यू, हाय स्ट्रीट गोल्ड, मिडटाउन ग्रे, डाउनटाउन रेड आणि अॅव्हेन्यू व्हाईट अशा रंगछटा आहेत. ही गाडी ह्युंदाय आय २०, फोक्सवागन पोलो यांची स्पर्धक मानली जात आहे.
ट्रायम्फ
स्ट्रीट ट्रिपल आरएस
युरोपीय देशांत २००७ साली आलेली 'स्ट्रीट ट्रिपल आरएस' ही 'ट्रायम्फ'ची
मोटारसायकल भारतीय मोटरपेठेत उपलब्ध झाली आहे. भारतीय ग्राहकांच्या हाती पडणाऱ्या
या मॉडेलची किंमत 11 लाख 13 हजार रुपये आहे आणि पूर्वीपेक्षा 9 टक्के
जास्त शक्ती आणि टॉर्कचा लाभ मिळणार आहे.
एका
ओळीत बसवलेले तीन सिलिंडर, प्रत्येकी चारप्रमाणे एकूण बारा व्हॉल्व असलेले
बीएस6 निकष
पूर्ण करणारे पेट्रोल इंजिन या गाडीवर बसवले आहे. अचाट शक्तिमान आणि अफाट वेगवान
असं त्याचे वर्णन केले पाहिजे. कारण प्रति मिनिट 11,750 फेऱ्यांमागे
ते 123 पीएस
एवढी प्रचंड ताकद निर्माण करते. त्याच वेळी 10,800 फेऱ्यांमागे
79 न्यूटन
मीटर टॉर्क निर्माण करते. यावरून या गाडीचा वेग आणि वेग घेण्याची क्षमता यांचा
अंदाज करता येईल.
मल्टि
पॉईंट सिक्वेन्शियल इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन या पद्धतीने या इंजिनला इंधन
पुरवठा होतो. 'एसएई
इलेक्ट्रॉनिक थ्रोटल कंट्रोल' पध्दतीने अक्सीलरेटर कमीजास्त करता
येतो. 'एसएई' म्हणजे
सडन अक्सीलरेशन इनसिडेन्स. वाहनांचा वेग झटकन कमीजास्त करताना झटका न बसता अलगद
गती कमीजास्त होते.
सहा
गतींचा गिअर बॉक्स असलेल्या या इंजिनला 'स्लिप असिस्ट' क्लच
आहे, आणि 'ओ
रिंग' पध्दतीचे
दुवे असलेल्या चेनमार्फत शक्ती व गती मागच्या चाकाला पुरवली जाते.
पुढील
सस्पेंशन अपसाईड डाउन पध्दतीचा फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक (मध्यभागी एकच)
सस्पेंशन वापरले आहे. पुढे 310 मिमी व्यासाची डिस्क आणि मागे 220 मिमी
व्यासाची डिस्क असलेले ब्रेक वापरले आहेत. स्विचच्या साहाय्याने चालूबंद करता
येणारी एबीएस सुविधा हे या गाडीच्या ब्रेक यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इंधन
न भरता 166 किलो
वजन आणि 17.4 लीटर
क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. या
गाडीची संपूर्ण भारतात सर्वत्र 11 लाख 13 हजार रुपये अशी समान किंमत आहे.
नवी 'महिंद्रा' 'KUV 100 NXT'
''बीएस
6' निकषांची पूर्तता करणारी 'महिंद्रा'ची नवी 'केयूव्ही 100
एनएक्सटी' मोटरपेठेत दाखल झाली आहे. 5 लाख 54 हजार ते 7 लाख 15
हजार रुपयांच्या दरम्यान विविध टप्प्यावर किंमत असणारी ही मोटार चार
प्रकारांत उपलब्ध होईल.
.1200 सीसी क्षमतेचे 'm FALCON G
80' नावाचे पेट्रोल इंजिन वापरलेल्या या
नव्या 'केयूव्ही'मध्ये स्वयंचलित गिअरबॉक्सचा पर्याय
नाही. तसेच ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनसह मिळते, डिझेल इंजिन नाही. 'मिड हायब्रीड' तंत्रज्ञान
वापरलेले हे पेट्रोल इंजिन 82 पीएस शक्ती आणि 115 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
'के 2+', 'के 4+', 'के 6+' आणि 'के 8+' अशा चार प्रकारांत ही गाडी मिळेल. सर्व प्रकारांत आसनक्षमता
सहा एवढीच आहे. मात्र 'के 2+' वगळता अन्य
तिन्ही प्रकारांत पुढे दोन आणि मागे तीन अशा बैठक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध आहे.
7 इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, ब्ल्यू टूथ, AUX संपर्कसुविधा, सेंट्रल लॉक, स्टेअरिंग व्हीलमध्ये बसविलेली ऑडिओ- टेलिफोन स्विच आणि
उंची जुळविता येणारी चालकाची बैठक ही वैशिष्ट्ये 'के 6+' आणि 'के 8+' यामध्ये उपलब्ध आहेत. 'के 2+'मध्ये सेंट्रल लॉक नाही, 'के 4+'मध्ये हाताने बंद करण्याचे सेंट्रल
लॉक आणि वरच्या दोन्ही गाड्यांना ते रिमोट कंट्रोलचे आहे.
इंजिन इम्मोबिलायझर, एसी व हीटर, इलेक्ट्रिक
पॉवर स्टेअरिंग, टिल्ट स्टेअरिंग या सुविधा सर्व मॉडेलमध्ये, तसेच चालक व
शेजारच्या व्यक्तीसाठी एअर बॅग, चाईल्ड सेफ्टी लॉक, सीट पट्ट्याची आठवण करून देणारा बझर या सुविधा चारही
प्रकारांत मिळतील.
चारही प्रकारांमध्ये एबीएस व ईबीडी
आहे, परंतु लहान
मुलांसाठी 'आयसोफिक्स' ही सुरक्षित
बैठक व्यवस्था फक्त 'के 8+' या सर्वात
वरच्या पातळीवरील मॉडेलमध्येच मिळेल.
'बीएस6' इंजिन ऑटोरिक्षाकरिता अनिवार्य
नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभासोबतच मोटार वाहनांना 'बीएस6' निकष लागू झाले
आहेत. याला कोणतेही वाहन अपवाद नाही. 'बीएस' निकष लागू करण्यास सुरुवात झाली तेव्हा भारतातील दोन चाकी वाहनांना फोर
स्ट्रोक इंजिने वापरणे अनिवार्य करण्यात आले. मात्र ऑटोरिक्षाचे इंजिन टू
स्ट्रोकचेच राहिले. परंतु या वेळी 'बीएस6' निकषांची पूर्तता करणारे इंजिन ऑटोरिक्षाकरिताही अनिवार्य झाले आहे.
महाराष्ट्रात 'बजाज', 'पिआगो' आणि 'टीव्हीएस' या
कंपन्यांच्या ऑटोरिक्षा वापरल्या जातात. या लेखात आपण 'बजाज
ऑटो'च्या रिक्षांचा विचार करू. बहुसंख्य रिक्षा कोणत्याही
शहरात अथवा गांवांत दिसतात. या कंपनीने 'बीएस6' निकष पूर्ण करणाऱ्या वेगवेगळ्या इंधनावर चालणाऱ्या रिक्षा विकसित केल्या
आहेत, आणि नवीन रिक्षा घेणाऱ्याला त्यातूनच निवड करावी लागेल.
'बजाज बीएस6' ऑटोरिक्षामध्ये पेट्रोल, सीएनजी, एलपीजी आणि डिझेल या इंधनांवर चालणारी गाडी निवडता येईल. पहिल्या तीन
इंधनासाठी एकच इंजिन आहे, आणि इंधनानुसार त्यांत किरकोळ फरक
आहेत. ही तिन्ही इंजिने प्रसंगी पेट्रोलवरही चालतात. नव्या निकषांच्या
शिफारशीप्रमाणे त्यांना अधिक कार्यक्षम कॅटालिटिक कन्व्हर्टर आणि रेडिएटर बसविले
आहेत. इंजिनाचे तापमान मोजून आवश्यक ती माहिती गाडीतील मध्यवर्ती संगणकीय नियंत्रक
उपकरणाला पुरविण्याचे काम करणारे सेन्सर्स बसविले आहेत. इंजिनमध्ये किंवा गाडीच्या
अन्य भागात काही बिघाड झाल्यास डॅशबोर्डावर सूचना देणारा दिवा पेटेल.
या तिन्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना 236
सीसी क्षमतेची फोर स्ट्रोक इंजिने वापरली आहेत. ती 9.8 बीएचपी एवढी शक्ती निर्माण
करतात. या इंजिनांना कारबुरेटर नाहीत, फ्युएल इंजेक्शन पद्धत
वापरली आहे. बाकी टायर साईझ, सस्पेंशन वगैरे पूर्वीप्रमाणेच
आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या गाडीची किंमत दहा ते पंधरा हजार
रुपयांनी वाढली आहे.
'बजाज' बनावटीच्या डिझेल ऑटोरिक्षाकरिता वापरलेले इंजिनही 'बीएस6'
या नव्या निकषांची पूर्तता करते. यालाही आवश्यक ते सेन्सर्स आहेत.
470 सीसी इंजिन आणि पाच पुढे जाण्याचे गिअर आणि रिव्हर्स आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता करणार रहदारीचं नियंत्रण
वाहतुकीची कोंडी अर्थात ट्रॅफिक जॅम ही नित्याचीच बाब बनली
आहे. रस्त्यांचे रुंदीकरण,
एकेरी वाहतूक व्यवस्था, अवजड वाहनांना बंदी, पार्किंगला बंदी असे अनेक उपाय योजूनही रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा
आणि त्यातून कासवगतीपेक्षाही कमी वेगाने पुढे सरकणारी वाहने हे काही टळत नाही. ही
कोंडी कमी करून वाहने मार्गस्थ करताना पोलिसांची होणारी दमछाक ही या विषयाची दुसरी
महत्त्वाची बाजू आहे. वाहतूक कोंडीच्या व्याप्तीचा अंदाज घेऊन वाहने पुढे
काढण्याच्या कामाला पडणारी मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेता 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न जगात सुरू झाले आहेत.

ही नवी संकल्पना समजावून घेण्यापूर्वी वाहतुकीची कोंडी
होण्याची कारणे आणि कोंडी सोडविण्याचे पारंपरिक उपाय यांची अगदी थोडक्यात माहिती
घेऊया.
वाहतुकीची कोंडी का होते?
•
कोणत्याही एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने येणे
हे कोंडी होण्याचे पहिले कारण आहे. सकाळी कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी जाणारे
आणि सायंकाळी परतणारे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. अनेक शहरांत कार्यालये, बाजारपेठा विशिष्ट भागात केंद्रित झालेल्या असतात. त्यामुळे सकाळी आणि
संध्याकाळी रस्त्याच्या एकेका बाजूला वाहनांची गर्दी वाढते. ही कोंडी टाळण्यासाठी
वाहतूक पोलीस सकाळी आणि संध्याकाळी पार्किंग करण्याच्या जागा गर्दीच्या विरुद्ध
दिशेला आलटून पालटून ठेवतात. तात्पुरते रस्ता दुभाजक वापरून रस्त्याच्या मोकळ्या
बाजूला जादा मार्गिका निर्माण करतात.
•
सुटीच्या दिवसांत बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांच्या एकाच
दिशेने होणाऱ्या प्रवासामुळे रस्त्यांवर कोंडी होते.
•
शहरात काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी कर्मचारी भरती, पुढाऱ्यांच्या जंगी सभा, प्रसिद्ध महोत्सव हीदेखील
कोंडी होण्याची कारणे आहेत.
•
वाहन चालकांमधील शिस्तीचा अभाव, एखादे वाहन नादुरुस्त झाल्याने वाटेतच उभे राहणे, शहरात प्रवेश करतेवेळी दुतर्फा उभी असलेली वाहने, मर्यादेपेक्षा जास्त रुंदीचे सामान नेणाऱ्या वाहनांचा रस्त्यावर प्रवेश, या गोष्टी वाहतुकीच्या कोंडीची करणे ठरतात. रेल्वे फाटक बंद असताना दोन्हीकडे
उभी राहणारी वाहने आपापल्या बाजूंनी पुरेसा रस्ता मोकळा सोडत नाहीत. फाटक उघडताच
दोन्हीकडील वाहने चालू लागतात आणि अडकतात.
•
तीव्र चढणीच्या रस्त्यावर जास्त वाहने येणे, खराब रस्ते,
मोकाट गुरांचा रस्त्यांवर संचार ही करणेसुद्धा आहेत.
• पारंपरिक पद्धतीने
चालणाऱ्या सिग्नल यंत्रणेला वाहतुकीचे नियंत्रण करताना काही मर्यादा पडतात.
भारतातील सिग्नल यंत्रणेत रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या आणि हिरवा दिवा चालू
राहण्याचा काळ यांचा संबंध दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी हिरवा दिवा असणाऱ्या
रस्त्यांवरील वाहने संपल्यावरही दिवा पेटलेला राहतो. याउलट जास्त वाहने येणाऱ्या
रस्त्यांवर वाहनांना चौक ओलांडेपर्यंत पुनःपुन्हा थांबावे लागते.
कृत्रिम बुद्धिमत्ता काय करणार?
रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या आणि प्रत्येक वाहनाचा
वेग तसेच ते धावत असलेल्या मार्गिकेवरील त्याची हालचाल या गोष्टी अचूकपणे
ओळखण्याची क्षमता 'कृत्रिम बुद्धिमत्ते'मुळे वाहतूक नियंत्रक उपकरणांना प्राप्त झाली आहे. याबरोबरच वाहनांची
रस्त्यावरची हालचाल चालकानुसार भिन्न असते. ते बारकाईने टिपण्याची क्षमताही
कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त उपकरणांकडे असते. ही उपकरणे या गोष्टी केवळ ओळखून
थांबत नाहीत तर गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून ती वाहने संबंधित चौकात केव्हा
येतील आणि ती येतील तेव्हा चौकातील रहदारीची कोणती आणि कशी अवस्था असेल त्याचा वेध
घेऊन ताबडतोब त्यावर उपायही शोधतात. तो उपाय योग्य त्या वेळी आणि योग्य प्रकारे
योजण्यास तयार होऊन त्या त्या वाहनांचे पुढील चौकात स्वागत करण्यासाठी सज्ज
राहतात. हे सारे वाचण्यासाठी जितका वेळ लागला असेल त्यापेक्षा शंभरपट कमी वेळेत ही
कामगिरी उरकली जाते. अगदी निमिषार्धात (fractions of second) हे अगदी बिनचूकपणे पार पाडले जाऊ शकणार आहे.
आपल्या देशात सामान्यपणे विशिष्ट सेकंद चालू राहणाऱ्या
दिव्यांचे सिग्नल वापरले जातात. तथापि, रस्त्याच्या
पृष्ठभागाखाली बसवलेल्या सेन्सरद्वारे वाहनाचा वेध घेऊन आपोआप दिवे लागण्याची
यंत्रणा अमेरिकेसारख्या प्रगत देशांत चाळीस वर्षे तरी अस्तित्वात आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्ता'
वापरून उभारण्यात येणाऱ्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत
सेन्सरबरोबरच 'जीपीएस',
अतिसूक्ष्म चित्रण करणारे 'एचडी'
कॅमेरे, ड्रोन अशा उपकरणांचा वापर केला जातो.
' जीपीएस'
तंत्रज्ञान वापरून दुरून येणारे वाहन विशिष्ट ठिकाणी
पोहोचण्यास किती वेळ लागू शकतो त्याचा अंदाज घेता येईल. समजा, एक रुग्णवाहिका रस्त्यावरून शहराकडे जात आहे. तिची प्रतिमा सिग्नल यंत्रणेला
दिसताच वाट मोकळी होण्याच्या दृष्टीने सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
अत्यंत सूक्ष्म प्रतिमा घेणारे व्हिडिओ कॅमेरे (एचडी
कॅमेरे) रस्त्यावरील प्रत्येक वाहनाचे चित्रण करतील. स्वयंचलित उपकरणांद्वारे त्या
प्रतिमांचा अभ्यास करून वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. अशा प्रकारे वाहतूक
नियंत्रण करण्याचे दोन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात प्रतिमेचा अभ्यास होऊन
वाहनाचा वेग,
सिग्नलपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ आणि एकापाठोपाठ
येणाऱ्या वाहनांची संख्या या माहितीचे विश्लेषण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात
आवश्यकतेनुसार सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप होईल.
या तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची उदाहरणे म्हणून चीनमधील
हाँगझो, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यातील पिट्सबर्ग या महानगरांची नांवे घेता
येतील.
'कृत्रिम बुद्धिमत्ते'च्या वापराचे फायदे:-
•
मनुष्यबळाची मोठी बचत हा या व्यवस्थेतून मिळणारा महत्त्वाचा
लाभ आहे. वाहतूक पोलिसांचे काम अत्यंत त्रासाचे, आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे आहे. त्यांना कामाचे तासही जास्त द्यावे
लागतात.
•
पोलिसांवरील ताण कमी होऊन तेच मनुष्यबळ अन्य संबंधित
कामासाठी वापरता येईल.
•
वाहनांच्या हालचालींचा आधीच अंदाज घेता आल्याने पर्यायी
मार्ग सुचविणे,
वाहने असतील त्यानुसार तांबडा अथवा हिरवा दिवा पेटविणे, वाहतूक सिग्नल आणि अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना यांत्रिक
व्यवस्थेद्वारे आपोआप दंड करणे तसेच नियंत्रक मनुष्यबळ आणि चालक यांच्यातील
वादविवाद टाळणे शक्य होईल.

टाटा सफारी परत आली !

टाटा अलट्रोझ आय टर्बो
एका ओळीत बसवलेले तीन सिलिंडर, प्रत्येकी चारप्रमाणे एकूण बारा व्हॉल्व असलेले बीएस6 निकष पूर्ण करणारे पेट्रोल इंजिन या गाडीवर बसवले आहे. अचाट शक्तिमान आणि अफाट वेगवान असं त्याचे वर्णन केले पाहिजे. कारण प्रति मिनिट 11,750 फेऱ्यांमागे ते 123 पीएस एवढी प्रचंड ताकद निर्माण करते. त्याच वेळी 10,800 फेऱ्यांमागे 79 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यावरून या गाडीचा वेग आणि वेग घेण्याची क्षमता यांचा अंदाज करता येईल.
मल्टि पॉईंट सिक्वेन्शियल इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन या पद्धतीने या इंजिनला इंधन पुरवठा होतो. 'एसएई इलेक्ट्रॉनिक थ्रोटल कंट्रोल' पध्दतीने अक्सीलरेटर कमीजास्त करता येतो. 'एसएई' म्हणजे सडन अक्सीलरेशन इनसिडेन्स. वाहनांचा वेग झटकन कमीजास्त करताना झटका न बसता अलगद गती कमीजास्त होते.
सहा गतींचा गिअर बॉक्स असलेल्या या इंजिनला 'स्लिप असिस्ट' क्लच आहे, आणि 'ओ रिंग' पध्दतीचे दुवे असलेल्या चेनमार्फत शक्ती व गती मागच्या चाकाला पुरवली जाते.
पुढील सस्पेंशन अपसाईड डाउन पध्दतीचा फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक (मध्यभागी एकच) सस्पेंशन वापरले आहे. पुढे 310 मिमी व्यासाची डिस्क आणि मागे 220 मिमी व्यासाची डिस्क असलेले ब्रेक वापरले आहेत. स्विचच्या साहाय्याने चालूबंद करता येणारी एबीएस सुविधा हे या गाडीच्या ब्रेक यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इंधन न भरता 166 किलो वजन आणि 17.4 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. या गाडीची संपूर्ण भारतात सर्वत्र 11 लाख 13 हजार रुपये अशी समान किंमत आहे.
''बीएस 6' निकषांची पूर्तता करणारी 'महिंद्रा'ची नवी 'केयूव्ही 100 एनएक्सटी' मोटरपेठेत दाखल झाली आहे. 5 लाख 54 हजार ते 7 लाख 15 हजार रुपयांच्या दरम्यान विविध टप्प्यावर किंमत असणारी ही मोटार चार प्रकारांत उपलब्ध होईल.
7 इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, ब्ल्यू टूथ, AUX संपर्कसुविधा, सेंट्रल लॉक, स्टेअरिंग व्हीलमध्ये बसविलेली ऑडिओ- टेलिफोन स्विच आणि उंची जुळविता येणारी चालकाची बैठक ही वैशिष्ट्ये 'के 6+' आणि 'के 8+' यामध्ये उपलब्ध आहेत. 'के 2+'मध्ये सेंट्रल लॉक नाही, 'के 4+'मध्ये हाताने बंद करण्याचे सेंट्रल लॉक आणि वरच्या दोन्ही गाड्यांना ते रिमोट कंट्रोलचे आहे.
इंजिन इम्मोबिलायझर, एसी व हीटर, इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग, टिल्ट स्टेअरिंग या सुविधा सर्व मॉडेलमध्ये, तसेच चालक व शेजारच्या व्यक्तीसाठी एअर बॅग, चाईल्ड सेफ्टी लॉक, सीट पट्ट्याची आठवण करून देणारा बझर या सुविधा चारही प्रकारांत मिळतील.
चारही प्रकारांमध्ये एबीएस व ईबीडी आहे, परंतु लहान मुलांसाठी 'आयसोफिक्स' ही सुरक्षित बैठक व्यवस्था फक्त 'के 8+' या सर्वात वरच्या पातळीवरील मॉडेलमध्येच मिळेल.
'बीएस6' इंजिन ऑटोरिक्षाकरिता अनिवार्य
‘बीएस-6’ वाहनांची विक्री दहा लाखांच्या घरात
'ई टी ऑटो' या वाहनविषयक महत्त्वाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात साडेसात लाख वाहनांची विक्री करणाऱ्या 'मारुती सुझुकी'पाठोपाठ 'ह्युंडाई मोटार'चा क्रमांक लागला आहे. 'ह्युंडाई'च्या 1,23,000 'बीएस6' गाड्या या काळात विकल्या गेल्या. त्यापाठोपाठ 'ह्युंडाई' गटातील 'किया मोटर्स', 'टोयोटा किर्लोस्कर' आणि 'एमजी मोटर्स' या तीन कंपन्यांनी पहिल्या पांचांत स्थान मिळविले आहे. मात्र या तिन्ही कंपन्यांची 'बीएस6' विक्री एक लाखाच्या आत राहिली असून 'एमजी मोटर्स'ची 'बीएस6' वाहनांची विक्री चारहजार एवढीच झाली आहे. 'टाटा मोटर्स' आणि 'महिंद्रा' या दोन्ही स्वदेशी मोटार उत्पादकांच्या 'बीएस6' मोटारींच्या विक्रीचा एकत्रित आकडा सातहजार एवढा आहे. विक्रीमध्ये तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या 'किया' आणि 'एमजी' या भारतात अगदी नवीन कंपन्या असून 'किया'ची 'सेल्टोस' आणि 'एमजी मोटर्स'ची 'व्हेक्टर' या दोन्ही मोटारी गेल्या आर्थिक वर्षातच 'पहिली उत्पादने' म्हणून भारतीय मोटरपेठेत दाखल झाल्या. मध्यम आणि उच्च गटातील या दोन्ही मोटारी अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या.
‘बीएस6' बोलेरो
महिंद्रा एम हॉक डी 75 हे 1.5 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन तिला शक्तीपुरवठा करते. 76 पीएस शक्ती आणि 210 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे टर्बो इंजिन आणि पांच गतींचा हाताने गिअर बदलण्याचा (मॅन्युअल) गिअरबॉक्स आहे.
ब्ल्यू टूथ, AUX आणि USB सुविधा, सर्व मॉडेलमध्ये पुढे चालकासाठी एअर बॅग, चालक व शेजाऱ्याला सीट बेल्ट लावण्याची सूचना देणारा बझर, स्पीड अलर्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि एबीएस तसेच वातानुकूलन व्यवस्था आहे. गाडीच्या दुरुस्ती देखभालीची वेळ जवळ आल्याची आठवण करून देण्याची व्यवस्था डॅशबोर्डावरील उपकरणात आहे.
'बीएस6' मॉडेल विकसित करताना कंपनीने इंजिनवर जास्त भर दिलेला दिसतो. बाह्यरूपात फार फरक नाही. पुढचा बंपर आकर्षक, त्यात फॉगलॅम्प, नव्या डिझाईनचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प आणि नव्या डिझाईनचे पुढचे रेडिएटर ग्रिल बसविलेली नवी बोलेरो सर्व पर्यायात सात आसनी मिळते. पुढे डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक आहेत.
'बीएस6' निकषांची पूर्तता करण्यासाठी या गाडीच्या इंजिनबरोबर डिझेल एक्झॉस्ट फ्ल्यूड (DEF) व्यवस्था आहे. यालाच काही कंपन्या add blue म्हणतात. इंजिनांतून बाहेर पडणाऱ्या धुरातील घातक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशिष्ट मायलेजनंतर हा द्रव पदार्थ भरावा लागतो. गाडीच्या दोन्ही बाजूंच्या मागच्या चाकांच्या वर टाक्यांची झाकणे दिसतात. त्यातले उजव्या बाजूचे डिझेल टाकीचे आहे, ते नेहमीप्रमाणे उघडते, मात्र डाव्या बाजूला तसेच दिसणारे झाकण एकदम मागच्या (टेल गेट) दरवाजाच्या आत दिलेली लीव्हर खेचून उघडावे लागते. ते DEF साठी आहे. हे काम अधिकृत अथवा प्रशिक्षित मेकॅनिककडून करून घेणे उत्तम. डिझेलच्या टाकीत DEF आणि DEF च्या टाकीत डिझेल चुकूनही भरले जाणार नाही याची काळजी वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे

रतीय मोटारवाहन उद्योगावरील मंदीची छाया, विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे भारत सरकारचे धोरण आणि पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या उत्पादनाबाबत भारतीय मोटार उत्पादक काहीसे संभ्रमात असण्याच्या संमिश्र पार्श्वभूमीवर 'किया' या कोरियन कंपनीची बहुप्रतीक्षित मोटार शनिवारी सरकत्या पट्ट्यावरून खाली उतरली. 'सेल्टोस' नावाची ही एसयूव्ही योगायोगाने नेमकी गोकुळाष्टमीच्याच मुहूर्तावर भारतीय मोटरपेठेत अवतरली.
@ चोरीस गेलेली मोटार शोधण्यासाठी स्टोलन व्हेईकल ट्रॅकिंग (SVT)
@ कॅबिन मधील हवा शुद्ध करणारी यंत्रणा
@ मुलांच्या बैठकीसाठी आयसोफिक्स व्यवस्था

२०२१ मध्ये भारतात येणार 'नेक्सो' फ्युएल सेल कार
२०१८ मध्ये झालेल्या भारत कोरिया परिषदेच्या प्रसंगी ही मोटार सादर करण्यात आली होती. पुढच्या वर्षी तिची भारतीय रस्त्यांवर चाचणी घेण्यात येईल आणि २०२१ मध्ये ती भारतीय ग्राहकांसाठी शोरूममध्ये दाखल होईल. मात्र तिला इंधन पुरविण्याची सक्षम यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. सुरुवातीला नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आणि पाठोपाठ निवडक महानगरांमध्ये या गाडीसाठी हायड्रोजन फ्युएल स्टेशने स्थापन करण्यात येतील. हे काम खाजगी क्षेत्रातील उद्योगांबरोबर सहयोग करून होईल.
ही मोटार अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे. अडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) या तंत्रज्ञानामुळे सुरक्षेचे अनेक पैलू साध्य झाले आहेत. लेन फॉलोईंग असिस्ट (एलएफए) मुळे ताशी १४५ एवढ्या भरधांव वेगातही ती लेन सोडत नाही. मागच्या बम्परखालील वस्तू तसेच चालकाला सहज न दिसू शकणाऱ्या आड असलेल्या वस्तू (ब्लाइंड स्पॉट परिणाम) व्यवस्थित पाहता याव्या याकरिता विशेष ब्लाइंड स्पॉट कॉलिजन अव्हॉइडन्स असिस्ट (बीसीए) हे एक वैशिष्ट्य आहे. फॉरवर्ड कॉलिजन अव्हॉइडन्स असिस्ट (एफसीए) या यंत्रणेमुळे गाडी पळताना पुढे अचानक अडथळा आल्यास गाडी आपोआप उभी राहण्याची व्यवस्था होते.

![]() |
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी सज्ज लायटीयरचा अंतर्भाग |
दुकाटी सेफ्टी पॅक - यामध्ये बॉश कॉर्नरिंग एबीएस आणि दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश होतो. अतिवेगवान मोटारसायकलींची रस्त्यावरची पकड विशेषतः: वळणावर सैल होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी कॉर्नरिंग एबीएस उपयोगी पडते. गाडीचा वेग आणि रस्त्यावरची पकड यांचे सांगड दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल घालते. याबरोबरच एकाएकी ब्रेक लावतं गाडी मागून उचलली जाऊ नये यासाठी दुकाटी व्हीली कंट्रोल ही यंत्रणा काम करते. या सर्व व्यवस्थांमुळे भरवेगात वळणे घेत जातानाही गाडी रस्ता न सोडता पळू शकते.
अर्थात सुपरबाइक चालविण्याचा भरपूर सर्व आणि अत्यंत सुस्थितीतील रस्ते या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याबरोबरच सार्वजनिक रस्त्यावरून अशी मोटारसायकल चालविताना वाहतुकीचे नियम, वेगमर्यादा आणि रस्ता वापरणारे इतर घटक यांचे भान राखले पाहिजे.
या गाडीची बॅटरी संपूर्ण पुनर्भारित करण्यासाठी ९ तास ३५ मिनिटे लागतात, हे काम चार्जिंग स्टेशनवर होते त्याप्रमाणेच घरच्या घरीही करता येते. प्रवासात असताना ५४ मिनिटांत बॅटरी ८०% पुनर्भारित करता येते. याबरोबरच गाडी चालताना जेव्हा तिचा वेग कमी होईल तेव्हा वीजनिर्मिती होऊन बॅटरीच्या शक्तीची बचत करता येते.
या गाडीची पाच वर्षांची अमर्याद अंतर हमी (अनलिमिटेड मायलेज वॉरंटी) उत्पादकांनी दिली आहे. यासोबतच आठ वर्षे किंवा दोन लाख किलोमीटर अंतराची हमी (वॉरंटी) उत्पादकांनी या गाडीच्या बॅटरीकरिता दिली आहे.
विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविण्यापूर्वी इतर अनेक बाजू विचारात घेतल्या पाहिजेत. प्रत्यक्ष वाहन उत्पादकांची तयारी ही त्यापैकी एक. एक तर भारतीय मोटरपेठेत सध्या मंदी आहे, वाहन उत्पादक 'युरो ६'ला सामोरे जाण्यासाठी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटारी अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी संशोधन करीत आहेत. मोटार कारच्या उत्पादनाकडून ते एसयूव्हीच्या उत्पादनाकडे वळताहेत. विद्युत वाहने तयार करायची तर पेट्रोलिअम वाहनांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी थाटलेल्या प्रयोगशाळांच्या उभारणीवर केलेल्या गुंतवणुकीचे काय करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.
विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांचा जमाना आल्यासंबंधीचा लेख गेल्याच महिन्यात 'मोटार जगत'मध्ये प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्र राज्याचे मार्ग परिवहन महामंडळ अर्थात 'एसटी' आणि महामुंबईची ऐतिहासिक बससेवा 'बेस्ट' या दोन्ही महत्त्वाच्या आस्थापनांनी विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांचे मोठे ताफे खरेदी करण्याचा निर्णय नुकताच घेतला, ते पाहता नव्या जमान्याची जोरदार सुरुवात अपेक्षेपेक्षा झाली आहे यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. केवळ याच दोन नव्हे तर भारतातील अन्य काही राज्यांतील सार्वजनिक परिवहन संस्थांनीदेखील विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे ठरविले आहे.
'दुकाटी'ची नवी 'हायपरमोटार्ड ९००'
ब्रेक आणि रस्त्यावरील पकड तसेच पळताना सतत बदलत राहणाऱ्या वेगवेगळ्या स्थितीत तिचे संतुलन नीट राखण्यासाठी 'हायपरमोटार्ड ९००' मध्ये सुरक्षाविषयक अनेक तरतुदी केल्या आहेत. पुढच्या चाकावर चार पिस्टन आणि मागच्या चाकावर एकेरी पिस्टन असलेला डिस्क ब्रेक आहे. पुढे ३२० मिमी व्यासाची आणि मागे २४५ मिमी व्यासाची डिस्क आहे. याच्या जोडीला तीन पातळ्यांवर वेगवेगळी कार्यक्षमता देणारी एबीएस व्यवस्था या गाडीसाठी वापरली आहे. याबरोबरच दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल नावाचे विशेष तंत्रज्ञानही वापरले आहे. या दोहोंच्या संयुक्त परिणामातून 'हायपरमोटार्ड ९००' ही भरधाव वेगातही अत्यंत सुरक्षितपणे पळणारी मोटारसायकल ठरली आहे असे उत्पादकांचे म्हणणे आहे.
नवी टोयोटा ग्लॅन्झा
![]() |
टोयोटा किर्लोस्कर'चे मॅनेजिंग डायरेक्टर मासाकाझू योशिमुरा आणि डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एन.राजा (डावीकडे)'ग्लॅन्झा'च्या अनावरण प्रसंगी |
- व्हॅनिटी मिरर आणि दिव्यासह चालकासमोरील सनविझर
- चालकाशेजारील प्रवेशाकरिता वरील दोन्ही गोष्टी
- स्टिअरिंग व्हीलभोवती लेदर आवरण
- आपोआप लागणारे विझणारे हेडलॅम्प
- कारपासून दूर जाताना/ कारकडे येताना लागून राहणारे हेडलॅम्प
- ऑडिओसह रिव्हर्स कॅमेरा
- चालक व त्याच्या शेजाऱ्यासाठी एअर बॅग
- अँटिलॉक ब्रेक सिस्टीम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (ईबीडी ) आणि ब्रेक असिस्ट
- बालकांसाठी 'आयसोफिक्स' बसविण्याकरिता आवश्यक व्यवस्था
- इमोबिलायझर
- रिव्हर्स पार्किंग सेन्सर
'जिक्सर'ची नवी जोडी मोटारपेठेत
- फोर स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन
- एकेरी ओव्हरहेड कॅमशाफ्ट २ व्हॉल्व
- प्रति मिनिट ८००० फेऱ्यांत १४.१ पीएस शक्ती
- प्रति मिनिट ६००० फेऱ्यांत १४.० न्यूटन मीटर टॉर्क
- पाच गतीचा गिअरबॉक्स
- फोर स्ट्रोक ऑइल कूल्ड इंजिन
- दुहेरी ओव्हरहेड कॅमशाफ्ट ४ व्हॉल्व
- प्रति मिनिट ९००० फेऱ्यांत २६.५ पीएस शक्ती
- प्रति मिनिट ७५०० फेऱ्यांत २२.६ न्यूटन मीटर टॉर्क
- सहा गतीचा गिअरबॉक्स
या 'मॉडयुलर' रस्त्यांच्या निर्मितीत डांबर अथवा सिमेंट काँक्रीट या पदार्थांऐवजी प्लास्टिक, रबर यांचा वापर करण्यात येतो. त्याचे अनेक फायदे होतात. चटकन लक्षात येणारा लाभ म्हणजे प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे कचऱ्याची समस्या कमी होते. काही प्लास्टिकच्या वस्तू जाळून नष्ट करूनही त्यांचे अवशेष ही डोकेदुखी ठरली आहे, अशा वस्तू हे रस्ते बनविण्यासाठी उपयोगात आणता येतात.
दुसरे मजेदार वैशिष्ट्य म्हणजे हे रस्ते काळेकुट्ट नसून पांढरे शुभ्र असतात त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होऊन उष्णता कमी होते. साहजिकच गाड्यांचे टायर गरम होणे आणि जागतिक उष्णतामानात भर पडणे टळेल.
याना निरनिराळे रंगही देता येतात त्यामुळे मार्गिका ओळखणे, रहदारीची विभागणी करणे सोपे ठरते. या रस्त्यांचा एक मोठं लाभ म्हणजे त्यांवरून वाहने जाताना आवाज कमी होईल. म्हणजे आपण ज्याला पर्यावरणाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानतो त्या प्लॅस्टिकच्या नियोजनपूर्वक पुनर्वापरातून प्रकाश, उष्णता आणि ध्वनी प्रदूषण कमी करणारी महत्त्वाची पायाभूत व्यवस्था उभारता येते.
या रस्त्यांच्या पृष्ठभागाचा वापर वाहनांसाठी 'नेव्हिगेशन' यंत्रणा, विद्युत ऊर्जेचा साठा याकारताही होऊ शकतो.
रस्त्यांचे हे 'प्रीकास्ट' भाग वजनाने हलके आणि चिवट असल्याने कारखान्यापासून उभारणी स्थळापर्यंत त्यांची वाहतूक करणे कितीतरी स्वस्त, जलद आणि कमी जोखमीचे ठरणार आहे. त्यांच्या निर्मितीकरिता वाया गेलेले प्लास्टिक हा मुख्य कच्चा माल असल्याने त्यांचे उत्पादन मूल्यही कमी असेल.
या रस्त्यांवर उखडल्याचे खड्डे पडण्याची शक्यता नाही, मात्र अति उष्णता, अति पाऊस आणि मर्यादेपेक्षा वजनदार वाहतूक यांसारख्य कारणांनी त्यांच्या पृष्ठभागाचे विचलन (वार्पेज ) होऊ शकते; तरीही रेल्वेचा मधलाच रूळ बदलता येतो त्याप्रमाणे या रस्त्यांचा खराब झालेला भाग बदलणे शक्य होईल.
मध्यम व्यावसायिक वाहन प्रकारात 'महिंद्रा'ची नवी ट्रक मालिका
![]() |
११, १२ आणि १४ टनी आणि वेगवेगळ्या लांबीचा हौदा निवडण्याची मुभा |
मध्यम व्यावसायिक वाहन प्रकारात (Intermediate Commercial Vehicles - ICV) समाविष्ट होणार हा ट्रक आहे. ११, १२ आणि १४टनी (जीव्हीडब्ल्यू ) क्षमतेची आणि त्यातही वेगवेगळ्या लांबीचा हौदा निवडण्याची मुभा असलेल्या मॉडेलांचे पर्याय देणारा हा ट्रक कंपनीने रॅडिअल टायर बसविलेला पहिला भारतीय ट्रक आहे. 'जास्तीत जास्त कमाई आणि कमीत कमी खर्च ' हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून विकसित केलेला हा ट्रक ग्राहकांना सादर करताना डॉ. गोएंका यांनी 'जादा प्रॉफिट, नहीं तो ट्रक वापिस' अशी घोषणा केली. या ट्रकद्वारे चालकाला कशा प्रकारे सुख व सुरक्षा मिळेल याची तपशीलवार माहिती डॉ. व्यंकटेश श्रीनिवास यांनी या मीडिया सादरीकरणामध्ये दिली.
![]() |
डावीकडील चित्रात 'फ्युरिओ 'ची दणकट चॅसी आणि
उजवीकडील चित्रात कॅबिनचा अंतर्भाग दिसत आहे. कॅबिनमध्ये
घडी घालता येणारी बर्थ आणि एका व्यक्तीला झोपता येईल अशी
चालकाची बैठक देण्यात आली आहे.
|

नवी वॅगन आर विक्रीसाठी खुली
![]() |
अनावरण समारंभात एमडी व सीईओ श्री. आयुकावा (डावीकडे ) |
गेल्या वर्षाच्या अखेरीपासून प्रतीक्षा असलेली 'नवी वॅगन आर ' आज देशभरात विक्रीसाठी खुली झाली. "गेल्या वीस वर्षांच्या काळात भारतातील २२ लाख कुटुंबांनी प्राधान्याने निवडलेली ही मोटार नव्या रूपात सादर करताना आनंद होत आहे," असे म्हणत मारुती सुझुकी इंडिया ' चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा यांनी तिचे अनावरण केले. दोन इंजिने आणि सध्या तसेच स्वयंचलित गिअरबॉक्सच्या निवडीचा पर्याय घेऊन ती शोरूममध्ये दाखल झाली आहे. नवी दिल्लीत ४ लाख १९ हजार ते ५ लाख ६९ हजार रुपये शोरूम किंमतीत तिचे दोन विविध प्रकार ग्राहकांना उपलब्ध आहेत. मुंबईत ती ४.२८ ते या किमतीत मिळेल.

![]() |
अनावरण प्रसंगी सीईओ आणि एमडी गुंटर बुट्स्चेक प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारीक यांच्यासह |
आणि 'टाटा हॅरिअर 'सुद्धा !
२०१८ च्या 'ऑटो एक्स्पो 'मध्ये प्रथम प्रदर्शित
केलेली 'टाटा हॅरिअर'सुद्धा याच दिवशी विक्रीसाठी
खुली झाली. "ही गाडी भारतीय मोटार पेठेत 'गेम चेंजर' ठरेल असा आशावाद प्रकट करत 'टाटा मोटर्स 'चे सीईओ आणि एमडी गुंटर
बुट्स्चेक यांनी तिचे अनावरण केले. 'टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे
अध्यक्ष मयांक पारीक 'हॅरिअर'च्या अनावरण समारंभाला
उपस्थित होते. ते म्हणाले,
"हे
वाहन म्हणजे जागतिक दर्जाचे उत्पादन ग्राहकांना देण्याच्या 'टाटा मोटर्स 'च्या सातत्यपूर्ण
प्रयत्नांचे यशस्वी फलित आहे."
'एसयूव्ही' वर्गातील टाटा हॅरिअर विकसित करताना उत्पादकांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. प्रगत 'इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी )' , चालकासह सहा एअर बॅगा आणि मुलांसाठी 'आयसोफिक्स ' तंत्राद्वारे सुरक्षित बनवलेलं खास बैठक या सुविधांसह ती ग्राहकांना उपलब्ध होईल. २ लिटर क्षमतेचे 'क्रायोटेक ' डिझेल इंजिन तिला १४० पीएस एवढी भरपूर शक्ती पुरवते. इलेक्ट्रॉनिक नियंत्रण असलेला प्रगत 'व्हेरिएबल जिऑमेट्री टर्बो चार्जर' वापरून धुराचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट्स अशा तीन अवस्थांमधून होणार शक्तीपुरवठा चाकांपर्यंत नेण्यासाठी सहा गतीचा मॅन्युअल गिअरबॉक्स वापरला आहे.
हॅरिअरचे एकाच मॉडेल असून त्यात सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. एकूण चौदा प्रकारे सुरक्षा देणारी ईएसपी यंत्रणा, एबीएस, ईबीडी आणि इमोबिलायझर यामुळे गाडी चालताना आणि पार्क केल्यावरही सुरक्षित राहू शकते, अर्थात वापरताना योग्य आणि आटोक्यात राहील एवढा वेग, सर्व नियंत्रक उपकरणांचे ज्ञान आणि त्यांचा काळजीपूर्वक वापर यांचे भान राखले पाहिजे.
'टाटां'च्याच नेतृत्वाखाली उत्पादित होत असलेल्या लॅण्ड रोव्हर या प्रसिद्ध मोटारीच्या डी ८ या प्लॅटफॉर्मवर हॅरिअर बेतली आहे. थोड्याथोडक्या नव्हे तर भारतीय रस्ता व हवामान व अन्य परिस्थितीतील २२ लाख किमी च्या खडतर चाचण्यांनंतर तिचे उत्पादन सुरु झाले. ही गाडी चालविताना ड्रायव्हिंगची मौज, संपूर्ण सुरक्षितता आणि केबिनच्या रुबाबदार अंतर्भागातील आराम अनुभवता येईल असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

बघा, बघा... वेगळीच दिसतेय ही मोटारबाइक !!
२०१८ या सरत्या वर्षात ज्या प्रायोगिक मोटारसायकली नव्याने सादर करण्यात आल्या त्यांत टीएमसी ड्युमॉं ही 'टॉप लिस्टेड' ठरली. विमानाचं इंजिन बसविलेल्या या मोटारसायकलीत 'हबलेस' चाकाचं तंत्र तर वापरलयच, पण बांधणी आणि रचनेच्या दृष्टीनेही ती सर्वस्वी 'नवीन ' आहे.
टीएमसी ड्युमॉंचं इंजिन लॉंगीट्युडिनल पद्धतीने बसवलंय, म्हणजे गाडीसमोर उभं राहून पाहिलं तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरताना दिसेल. त्याची गती दोन्ही चाकांना पुरवली जाते. त्यासाठी कारमधल्या सीव्ही जॉइण्ट पद्धतीचे आस वापरलेत. मात्र चाकांना हब नाहीत, त्याच्या रिमला गती दिल्यावर गाडी चालू लागते. (पहा - हबलेस चाकं - पान - तंत्रज्ञान )
![]() |
डावीकडे - टीसीएम ड्युमॉं तयार होताना; उजवीकडे - चासी, इंजिन बसण्याची रीत, सगळंच निराळं ! |

चालकाशिवाय चालणारी 'व्होल्व्हो व्ही ९९ सीसी'
नेक्सन ठरली पहिली भारतीय पंचतारांकित सुरक्षित कार
![]() |
साईड इम्पॅक्त चाचणीला समोरी जाणारी टाटा नेक्सन |
![]() |
अपघात चाचणी देणारी महिंद्रा मॅराझो (छाया-रष लेन च्या सौजन्याने ) |
पूर्वीचा रुबाब घेऊन आलीय नवी 'जावा'
जुन्या मोटारसायकलीं च्या शौकिनांसाठी जुन्या रुबाबदार शरीरयष्टीची 'जावा ' नव्या फोर स्ट्रोक इंजिनासह बाजारपेठेत आली आहे. जावा, जावा फॉर्टी टूआणि पेराक अशा तीन मॉडेलांमध्ये ती ग्राहकांना उपलब्ध होईल पहिली दोन मॉडेले नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोटरपेठेत येतील तर पेराक मागाहून तयार केली जातीय.
जावा फॉर्टी टू एक लाख पंचावन्न हजार रुपये, जावा एक लाख चौसष्ट हजार रुपये आणि पेराक एक लाख एकोणनवद रुपये अशा त्यांच्या किमती आहेत.
नव्याने दाखल होणाऱ्या या 'जावा ' वाटर कूल्ड फोर स्ट्रोक इंजिनावर चालणार वर असून पहिल्या दोन मॉ डेलां साठी ३०० सीसी क्षमतेचे एक सिलिंडरचे२७ बीएचपी शक्ती आणि २८ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे इंजिन वापरले आहे. जावा पेराकसाठी ३३४ सीसी क्षमतेचे ३० बीएचपी वापरले आहे. एक गाडीला आता सहा गतींचा गिअरबॉक्स बसवला आहे. तसेच विद्युत स्टार्टरही आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही नवी जावा जुन्या गाडीसारखी पेट्रोल टाकी, मडगार्ड आणि पॅनल घेऊन आली आहे. हेडलॅम्प, त्यातून बाहेर आलेले शिंगासारखे हॅन्डल या गोष्टी जावा शौकिनांना खास खरेदीचा आनंद नक्कीच देतील.
इंजिन नवे असले तरी दोन सायलेन्सर कायम ठेवले आहेत. ओव्हरहेड कॅमशाफ्ट फोर स्ट्रोक इंजिन असले तरी त्याचे हेड अशा तऱ्हेने तयार केले आहे पूर्वीच्या ब्लॉकमधून बाहेर येणाऱ्या सायलेन्सरचा भास व्हावा. टाचेने गिअर लिव्हर आतमध्ये दाबून ऐटीत किक मारण्याची मौज मात्र नव्या गाडीत मिळणार नाही.
नवीन जावा सादर करताना उत्पादकांनी तिला पुढे २८० मिमी व्यासाचा डिस्क ब्रेक बसवला आहे. मागे ड्रम ब्रेक असला तरी एबीएस प्रणाली बसवली आहे. तरीही तिचे मागचे-पुढचे शॉकी आबसॉर्बर जुन्या ऐतिहासिक गाडीच्या आठवणी जाग्या करतात.
No comments:
Post a Comment