मोटार कायदा

'वाहन मोडी'चे धोरण 


खरे म्हणजे 
'व्हालंटरी व्हेईकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्रॅमअसे त्या योजनेचे नांव आहेपण 'स्क्रॅपिंग पॉलिसीम्हणून तिचा बोलबाला झाला आहे आणि ही कल्पना नक्की काय आहे याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. अधिकाधिक चांगल्या स्थितीतील वाहनांनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी देऊन रस्ते अधिक सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त बनविणे हे भारत सरकारच्या 'वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यालयाच्या या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 'व्हालंटरी व्हेईकल मॉडर्नायझेशन प्रोग्रॅमया लांबलचक नावातील शब्दांची आद्याक्षरांनी बनलेल्या 'व्हीव्हीएमपीया लघुसंज्ञेने ही योजना ओळखली जाते. आपण त्याला 'वाहनमोडीचे धोरणम्हणूया. या धोरणाची अंमलबजावणी केल्याने जुनी नव्हे तर जुनाट आणि तंदुरुस्त नसलेली वाहने मोडीत काढण्यासाठी एक अधिकृत व्यवस्था निर्माण करण्यात येईल. ही व्यवस्था कशा प्रकारे उभी राहील याचा मागोवा भारत सरकारच्या 'वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यालया'च्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे घेऊया.

 'वाहन मोडी'चे धोरण केवळ जुनी वाहने भंगारात काढण्यापुरते मर्यादित नाही. त्याची बरीच उद्दिष्टे आहेत. आयुर्मर्यादा आणि नोंदणीकाल संपलेली जवळजवळ एक कोटी वाहने मोडीत काढून प्रदूषण कमी करणे हे त्यातील पहिले आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने साध्य करण्याच्या अन्य बाबी पुढीलप्रमाणे:-

• रस्तेप्रवासी आणि वाहनांची सुरक्षितता वाढवणे;

• वाहनांच्या विक्रीला चालना देऊन या क्षेत्रात रोजगार निर्माण करणे;

• इंधन कार्यक्षमता वाढवून वाहन मालकांवरील दुरुस्ती खर्चाचा भार हलका करणे;

• सध्या अस्तित्वात असलेल्या असंघटित भंगार उद्योगाला सुव्यवस्थित आकार देणेआणि;

• (पुनर्वापर तंत्राद्वारे) वाहनपोलाद आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रासाठी स्वस्त कच्च्या मालाची उपलब्धता वाढविणे.

या धोरणाच्या अंमलबजावणीतून आकाराला येणारा उद्योग म्हणजे केवळ वाहने मोडून टाकण्याची 'भंगारक्षेत्रेनसून वाहनांची तंदुरुस्ती तपासणारी स्वयंचलित केंद्रे (ऑटोमेटेड फिटनेस सेंटर्स) देशभर उभारणे हा त्या योजनेचा महत्त्वाचा भाग असेल. त्यामुळे कोणती वाहने तोडली जात आहेत अथवा गेली आहेत त्यांची रीतसर नोंद करण्याची सुविधा निर्माण होईल. परिणामी चोरीसारख्या मार्गाने मिळविलेली वाहने मोडून पैसा निर्माण करणे अशा गोष्टींना आळा बसेल. सध्या जुने वाहन भंगारात काढताना त्याची किंमत घासाघीस करून ठरविण्यात येतेनवी व्यवस्था आल्यानंतर वाहनाच्या उपयोगिता (निरुपयोगिता म्हणा हवे तर) निर्देशांकाच्या आधारे किंमत ठरविता येईल. दुसऱ्या शब्दांतभंगार वाहनांच्या मूल्यांकनाचे प्रमाणीकरण केले जाईल. वाहने मोडीत काढण्याचे काम अधिकृत केंद्रांमध्ये होऊ लागले की सरकारला कररूपाने उत्पन्नही मिळेल.

 सरकारने 'स्क्रॅपिंग पॉलिसीआणण्याची घोषणा केल्यापासून हे धोरण म्हणजे ठराविक काळ वापरल्यानंतर गाड्या भंगारात द्याव्या लागणार असा भीतीयुक्त गैरसमज अलगद वाहन धारकांमध्ये पसरला. परंतु 'वाहन जुने झाले म्हणून नव्हे तर ते तंदुरुस्त नसेल तर मोडीत काढायचेअशा शब्दांत एकदा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एकदा या धोरणावर भाष्य केलेत्याचा अर्थ नीट जाणून घेतला पाहिजे. गडकरी म्हणतात, "वाहनमोडीचे धोरण (व्हीव्हीएमपी) ही भारतातील रस्त्यांवर अधिकाधिक चांगल्या अवस्थेतील वाहनांचे अधिराज्य स्थापन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. प्रोत्साहन आणि फेटाळणी यांचे सुयोग्य मिश्रण असणाऱ्या या धोरणातून अधिक सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ हवा हे लाभ प्राप्त होतील."

 

वाहनांचे सध्याचे आयुर्मान :- व्यावसायिक वाहनांच्या तंदुरुस्तीची (फिटनेस) दर दोन वर्षांनी तपासणी होते आणि ती आठ वर्षांची झाल्यावर ही तपासणी दरवर्षी होते. या प्रवर्गातील वाहनांची नोंदणी त्यांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्राच्या वैधतेशी निगडित असते.

 खाजगी वाहनांची नोंदणी पंधरा वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी वैध तंदुरुस्ती प्रमाणपत्र अनिवार्य असते. नूतनीकरण पाच वर्षांसाठी होते.

स्वयंचलित तपासणीमध्ये वाहन उत्तीर्ण झाल्यास ते सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्यास योग्य असल्याची मान्यता प्राधिकृत अधिकारी देतील. अनुत्तीर्ण वाहनाला ELV (एन्ड ऑफ लाईफ) ठरवून ते मोडीत काढण्यायोग्य मानले जाईल.

ही प्रक्रिया व्यावसायिक वाहनांसाठी पहिल्या आठ वर्षांनंतर दरवर्षी करावी लागेल आणि खाजगी वाहनांसाठी पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यावर करावी लागेल. तपासणीत अनुत्तीर्ण झालेल्या वाहनांची फेरतपासणी करण्यासाठी अपील करण्याची तरतूद आहेफेरतपासणीत उत्तीर्ण झालेल्या खाजगी वाहनाची नोंदणी पुढे पाच वर्षांकरिता चालू राहील.

 व्यावसायिक वाहनांचे दरवर्षी पासिंग करण्याची आणि खाजगी वाहनांची पुढच्या पाच वर्षांसाठी नोंदणी करण्याची  पद्धत यापूर्वीही होतीचत्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सक्षम अधिकारी तपासणी करत असत. यापुढे ही तपासणी स्वयंचलित उपकरणांद्वारे करण्यात येईल तसेच तपासणी आणि उत्तीर्ण वाहनांची नोंदणी याकरिता भराव्या लागणाऱ्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे शुल्क पुढीलप्रमाणे :-

पंधरा वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी

तपशील               वाहनाचा प्रकार                       सध्याचे शुल्क             नवीन शुल्क

तपासणी शुल्क     हलके वाहन                              ६००/-₹                      ,०००/-₹   

                         मध्यम मालवाहू/ प्रवासी वाहन     १,०००/-₹                   ,३००/-

                         अवजड मालवाहू/ प्रवासी वाहन     ,०००/-₹                   ,३००/-

तंदुरुस्ती प्रमाणपत्र

(फिटनेस सर्टिफिकेट)हलके वाहन २००/-₹      ,५००/-₹   मध्यम मालवाहू/ प्रवासी वाहन   २००/-₹   १०,०००/-

अवजड मालवाहू/ प्रवासी वाहन १,०००/-₹   १२,५००/-

 खाजगी वाहनांसाठी सध्या नवीन आणि नूतनीकरण नोंदणी करण्यासाठी ६००/-₹ शुल्क आकारले जातेआता नवीन वाहनांचे नोंदणी शुल्क ६००/-₹ एवढेच ठेवण्यात आले आहेमात्र पंधरा वर्षांपेक्षा जुन्या खाजगी वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठीचे शुल्क ५०००/-₹ करण्यात आले आहे. नूतनीकरणाचे शुल्क पूर्वी ६००/-₹ होते ते आता १०००/-₹ करण्यात आले आहे आणि त्यासाठी स्वयंचलित उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येईल.

 वाहन मोडीत काढायचे म्हणजे नुकसान असे समजण्याचे कारण नाहीमोडीत काढणाऱ्यांना काही विशेष लाभ मिळतील. या धोरणामध्ये वाहनांच्या मोडीच्या किमतीचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही रक्कम साधारणपणे त्या प्रकारच्या नवीन वाहनाच्या शोरूममधील किमतीच्या ४ ते ६% असेल. वाहन मोडीत काढणाऱ्यांना राज्य सरकारने नव्या वाहनाच्या करामध्ये सूट देण्याचे निर्देशही आहेत. खाजगी वाहनांना २५% तर व्यावसायिक वाहनांना १५% सूट मिळेल. नव्या वाहनाच्या नोंदणी शुल्काची सवलत हाही एक लाभ आहे. मोडीत काढल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना खरेदीमध्ये पाच टक्के सवलत देण्याची सूचना वाहन उत्पादकांना देण्यात आली आहे.

 स्वयंचलित तपासणी केंद्रे (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स- ATS) आणि नोंदणीकृत वाहनमोड सुविधा (रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी - RVSF) यांची उभारणी हा या धोरणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे. पहिल्या टप्प्यात देशात ७५ 'एटीएससुरू करण्यात येणार आहेत आणि देशभरात साडेचारशे ते पाचशे 'एटीएसस्थापण्याचे उद्दिष्ट आहे.

शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने तोडण्याची ५० ते ७० केंद्रे (RVSF) येत्या चारपाच वर्षांत उभारण्यात येतील.

ही उभारणी PPP म्हणजेच सार्वजनिक- खाजगी - भागीदारी तत्त्वावर करण्यात येईल.

व्यावसायिक स्वयंचलित तपासणी केंद्रे नागरिक वैयक्तिक पातळीवर अथवा संघटित होऊन उभारू शकतातराज्य सरकारेकंपन्या उभारू शकतात. त्या केंद्रांमध्ये आवश्यक प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहेतसेच त्या ठिकाणी फक्त तपासण्या केल्या जातीलदुरुस्तीची कामे होणार नाहीत. पाच लाख रुपये अनामत आणि एकंदर साठ हजार रुपये नोंदणी शुल्क भरून असे सुसज्ज तपासणी केंद्र अधिकृतपणे नोंदविता येईल.

 वाहनमोडकेंद्राच्या उभारणीसाठी एक लाख रुपये प्रक्रिया शुल्कदहा लाख रुपये अनामत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आणि दर्जाविषयक 'आयएसओप्रमाणपत्र आवश्यक ठरविले आहे.

 शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने तोडण्याची प्रक्रिया अधिकृत केंद्रांमध्ये केली जाईलत्यामुळे बॅटरीसारख्या घटकांची विल्हेवाट लावताना उद्भवणारा धोका टाळणे शक्य होईलतसेच स्वच्छता आणि पर्यावरणीय सुरक्षितता या गोष्टीही साध्य होतील. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य याबाबतही चांगले वातावरण निर्माण होईल अशी आशा बाळगता येईल.

 ----------------------------------------------------------------------------------------------------------

फास्ट टॅग उपलब्ध असलेल्या बँकांची यादी 


   बँक                                फोन नंबर 
·   
·         Axis Bank:                                  1800-419-8585
·         ICICI Bank:                                 1800-2100-104
·         IDFC Bank:                                 1800-266-9970
·         State Bank of India:                   1800-11-0018
·         HDFC Bank:                               1800-120-1243
·         Karur Vysya Bank:                     1800-102-1916
·         EQUITAS Small Finance Bank: 1800-419-1996
·         PayTM Payments Bank Ltd:      1800-102-6480
·         Kotak Mahindra Bank:               1800-419-6606
·         Syndicate Bank:                         1800-425-0585
·         Federal Bank:                             1800-266-9520
·         South Indian Bank:                    1800-425-1809
·         Punjab National Bank:               080-67295310
·         Punjab & Maha Co-op Bank:  1800-223-993
·         Saraswat Bank:                          1800-266-9545
·         Fino Payments Bank:                1860-266-3466
·         City Union Bank:                        1800-2587200
·         Bank of Baroda:                         1800-1034568
·         IndusInd Bank:                          1860-5005004
·         Yes Bank:                                   1800-1200
·         Union Bank:                               1800-222244
·         Nagpur Nagarik Sah Bank Ltd: 1800-2667183
  

बीएस निकषांचा गोंधळ 

मंदीपेक्षाही गंभीर वाटावा असा एक प्रश्न भारतीय मोटार क्षेत्रापुढे उभा राहिला आहे. BSVI अर्थात भारत स्टेज-६ (बीएस-६) हे निकष १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात येणार आहेत. म्हणजे अजून सात महिन्यांनी. त्यानंतर भारतात तयार होणाऱ्या सर्व मोटारगाड्या 'बीएस-६' निकषांची पूर्तता करणाऱ्या असतील. सध्या भारतात 'बीएस-४' निकष पूर्ण करणाऱ्या गाड्या तयार होतात. काही परदेशी उत्पादकांनी त्यापुढील निकषपूर्तीच्या मोटारी यापूर्वीच आणल्या आहेत. केंद्र सरकारने असाही निर्णय घेतला आहे की ३१ मार्च २०२० पर्यंत नोंदविल्या जाणाऱ्या सर्व मोटारगाड्या त्यांच्या नोंदणीची मुदत पूर्ण होईपर्यंत वापरता येतील. या दोन्ही निर्णयांमुळे मोटारवाहन वापरण्यासंबंधी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे.

बीएस-६ निकषांची पूर्तता करण्यासाठी वाहन उत्पादकांना डिझेल आणि पेट्रोल वाहनांच्या रचनेत मोठे बदल करावे लागतील. याबरोबरच या दोन्ही इंधनांमध्येही बरेच बदल होतील. हे बदल त्यांच्या धुरातील विषारी आणि घातक द्रव्ये पूर्णतः  कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. अर्थात १ एप्रिल २०२० पासून ही सुधारित इंधने उपलब्ध झाली पाहिजेत, पण आमच्याकडील माहितीनुसार ती सुरुवातीला दिल्ली आणि अन्य महानगरांमध्ये उपलब्ध होतील. मात्र १ एप्रिल २०२० नंतर बीएस-४ वाहने तयार केली जाणार नाहीत. त्याच वेळी ३१ मार्च २०२० पर्यंत नोंदविलेली वाहने अधिकृतपणे चालू राहतील. होणार आहे ते असे की महानगरांमध्ये दोन्ही प्रकारची वाहने आणि दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातील, पण उर्वरित प्रदेशांत बीएस-६ वाहनांसाठी आवश्यक ते सुधारित इंधन तोपर्यंत उपलब्ध झाले नाही तर त्या वाहनांच्या इंजिनांवर गंभीर परिणाम होतील; आणि बीएएस-४ वाहनांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच सगळीकडे फक्त सुधारित इंधनांचाच पुरवठा होऊ लागला तर त्यांच्या इंजिनांवर विपरीत परिणाम होईल. जेव्हा शिसेविरहित पेट्रोल बाजारात आले तेव्हा साधे पेट्रोल मिळणे लवकरच बंद झाले आणि शिसेविरहित पेट्रोलसाठी आवश्यक ते 'कॅटॅलिटिक कन्व्हर्टर' (कॅट) मात्र त्यावेळी वापरात असणाऱ्या जुन्या गाडयांना नव्हते.  असे झाले की मुख्य उद्देशच बाजूला पडतो. यावेळी तसे होऊ नये हीच अपेक्षा. यासाठी दोन प्रकारची वाहने वापरात असेपर्यंत दोन्ही इंधने व्यवस्थित उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासनाचे नियंत्रण आणि मॉनिटरिंग पाहिजे.  

मोटार वाहन वापरताना पाळावयाचे प्राथमिक नियम 


         केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९९४ च्या सुधारणांसह ) यानुसार भारतातील मोटार वाहनांचे नियमन केले जाते. भारतात १९३९ साली या प्रकारचा कायदा प्रथम बनविण्यात आला. त्या कायद्याचा आढावा घेऊन काळाच्या गरजेनुसार व्यापक कायदा तयार करण्यासाठी १९८४ मध्ये एक कामकाज गट नियुक्त करण्यात आला. भारतातील मध्यवर्ती परिवहन संस्था, स्वचालित संशोधन संघटना, वाहन उत्पादक, अन्य परिवहन संघटना आणि  सर्वसाधारण जनता यांच्या शिफारशी आणि सूचना तसेच देशातील विविध घटकराज्ये यांच्याकडून प्राप्त झालेले शेरे या सर्वांचा विनियम होऊन १९८८ साली तयार करण्यात आलेला नवा अधिनियम १ जुलै १९८९ रोजी अमलात आला.
                  मोटार वाहने वापरणाऱ्यांशी या कायद्यातील ज्या बाबींचा नेहमी संबंध येतो त्यांची ओळख येथे करून देण्यात आली आहे.












No comments:

Post a Comment

Featured Post

  चालकांनी दररोज म्हणावे असे ‘ मार्ग सुरक्षा श्लोक ’       वाहनांनी गजबजलेले रस्ते हे राष्ट्रीय प्रगतीचे एक चिन्ह. वाहनात बसून प्रवा...